शिष्यवृत्ती परीक्षेला जाताना घ्या 'ही' काळजी

मुंबई: राज्यातल्या आठवी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची येत्या रविवारी १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत ही परीक्षा राज्यभर घेतली जाते. विद्यार्थ्यांना एव्हाना त्यांचे प्रवेशपत्र मिळालेले असेल. परीक्षेपूर्वी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचाही जास्तीत जास्त सराव करा. परीक्षेची वेळ पेपर १ - सकाळी ११ ते १२.३० पेपर २ - दुपारी १.३० ते ३ परीक्षेला जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा : - आपल्या प्रवेशपत्रात नमूद केलेल्या परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेपूर्वी किमान एक दिवस अगोदर पालकांना ठाऊक असावा, जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही. - परीक्षेपूर्वी किमान अर्धातास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे गरजेचे आहे. - पेपर हाती पडल्यावर उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्याअगोदर मुखपृष्ठावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. - कॅल्क्युलेटर, मोबाइल, पुस्तके आदी साहित्य परीक्षा केंद्रावर नेऊ नये. - उत्तरे नोंदवण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा. प - प्रश्नपत्रिका संचकोड उत्तरपत्रिकेवर अचूक वर्तुळ रंगवून भरा. - उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाणार आहे. त्यामुळे ती फाटणार नाही, चुरगळणार नाही याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bq1FZH
via IFTTT

Post a Comment

0 Comments