दहावी परीक्षा:...म्हणून परीक्षेला घाबरू नका!

दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची धाकधुक आहे. या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी मोलाच्या टीप्स दिल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीने यासंदर्भात देशमुख यांच्याशी लाइव्ह फेसबुक संवाद साधला. दहावीत ४० टक्के प्रश्न सोपे, ४० टक्के प्रश्न मध्यम, २० टक्के प्रश्न कठीण असतात. प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने तयार होत असल्याने विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. पाहुयात काही महत्त्वाचे मुद्दे - > ssc बोर्डाच्या प्रश्नपत्रिका दरवर्षी सोप्या असतात, तेव्हा घाबरून जाण्याचे कारण नाही. > उपयोजित लेखनाकडे लक्ष द्या, म्हणजे भाषा विषय सोपा जाईल. > वेळेचे नियोजन -प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं तर त्या वस्तुनिष्ठ उत्तरांकडे झुकल्या आहेत. उत्तरे थोडक्यात द्यावयाची असतात. त्यामुळे वेळ पुरणार आहे. > भाषा विषयांमध्ये लेखन कमी असते. > आदल्या दिवशी किती अभ्यास करावा - बोर्डाच्या परीक्षेला प्रत्येक पेपरच्या आधी एक दिवस सुट्टी. त्यामुळे दीड दिवस पूर्ण उजळणीसाठी मिळणार आहे. > ज्या दिवशी पेपर संपवून घरी याल त्या अर्ध्या दिवशी संपूर्ण पाठ्यपुस्तकाची उजळणी करावी. > दुसऱ्या दिवशी काढलेली टिपणं, नोट्स याची रिव्हीजन करा. > जुन्या उत्तरपत्रिका पाहा. त्यात कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, तो दुरुस्त करा. > जागरण करू नये. कमीत कमी आठ तास झोप घ्यावी. > प्रश्नपत्रिकेचे किंवा कृतीपत्रिकेचे तीन भाग असतात - ४० टक्के प्रश्न सोपे, ४० टक्के प्रश्न मध्यम, २० टक्के प्रश्न कठीण असतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38g2AJo
via IFTTT

Post a Comment

0 Comments