Also visit www.atgnews.com
इंजिनिअरिंग कॉलेजांनी विद्यार्थ्यांकडून फी घेऊ नये: AICTE
देशभरातील शाळांनंतर आता महाविद्यालयांच्या फीसंदर्भात नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार परिस्थिती सामान्य होईपर्यंत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून फी मागू नये अशा सूचना ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात ने दिल्या आहेत. लॉकडाउन २ मध्ये महाविद्यालयांना दिलेली ही सूचना विद्यार्थी व पालकांसाठी मोठा दिलासा देणारी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ( ) ने सर्व संलग्न महाविद्यालयांना या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीशीत असे म्हटले आहे की, 'देशात लॉकडाऊन पूर्ण होईपर्यंत आणि परिस्थिती पुन्हा सामान्य होईपर्यंत एआयसीटीईशी संबंधित कोणतेही अभियांत्रिकी / तांत्रिक महाविद्यालय किंवा संस्था त्यांच्या विद्यार्थ्यांना / पालकांवर शुल्क भरण्यास दबाव आणणार नाही.' पीजीडीएम अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना देखील स्वतंत्र नोटीस बजावून या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एआयसीटीईने असे आश्वासन दिले आहे की लॉकडाऊन दरम्यान प्राध्यापक व अन्य कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कोणताही विलंब होणार नाही. काही संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देत नसल्याचा अहवाल मिळाल्यानंतर परिषदेने हे स्पष्ट केले आहे. काहींनी कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले. एआयसीटीईने म्हटले आहे की त्या सर्व कर्मचार्यांना नोकरीवर परत रुजू करून घेतले जाईल. यासाठी एआयसीटीईने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र देखील पाठविले आहे. एआयसीटीईने महाविद्यालये / संस्थांना त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांनाही इंटरनेट सुविधा शेअर करण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा सुरळीत नाही अशा भागातील विद्यार्थ्यांसाठी हजेरीत सवलत देण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठांच्या परीक्षा कशा घ्यायच्या याचबरोबर नवीन सत्रांचे आयोजन कसे करायचे याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगानेही एक समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फतही परीक्षांच्या विचार विनियम करून अहवाल सादर केला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3exH7QG
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments