Also visit www.atgnews.com
लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन परीक्षा; दिल्ली विद्यापीठापुढे आव्हान
नवी दिल्ली: ऑनलाइन परीक्षा घ्यायच्या की नाही यावर दिल्ली विद्यापीठात () मोठा वादविवाद झडतो आहे. लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन कशी होणार हा मोठा प्रश्न आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या दिल्ली विद्यापीठाच्या प्रस्तावाला शिक्षक आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचाही विरोध आहे. आपल्या युजी आणि पीजी प्रवेश परीक्षांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीची मदत घेते, तर सत्र परीक्षा विद्यापीठ स्वत: कशी घेणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने या ऑनलाइन परीक्षांची जबाबदारी डीयू कॉम्प्युटर सेंटरवर सोपवली आहे. करोना लॉकडाऊनमुळे ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या प्रस्तावावर डीयूच नव्हे तर अन्य विद्यापीठे देखील विचार करीत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षांबाबतचा निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती या आठवड्यात आपल्या शिफारशी देणार आहे. या शिफारशींच्या आधारे युजीसी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या सल्ल्याने मार्गदर्शन तत्वे आखणार आहे. डीयू देखील याची प्रतीक्षा करत आहे. डीयूचे कुलगुरू योगेश त्यागी म्हणाले, "लॉकडाऊनमुळे आम्हाला या सत्रातील परीक्षा घेण्यासाठी असा वेगळा आणि नवा विचार करावा लागला. दिल्ली विद्यापीठात एकूण सुमारे ९ लाख विद्यार्थी आहेत. नव्या सत्रासाठी आम्ही आमच्या तयारीचा आढावा घेत आहोत.'' शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, डीयूचे विद्यार्थी देशभरातून येतात. काही अगदी दूर दुर्गम भागातून येतात. काही इतक्या दुर्गम भागात राहतात, की तेथे ऑनलाइन परीक्षांसाठी मुलभूत सुविधा देखील नाहीत. डीयूचे एक्झिक्युटिव्ह काऊन्सिलचे सदस्य डॉ. राजेश झा म्हणतात, 'विद्यार्थ्यांकडे सुविधा नाहीत. मुलांकडे वर्गातला अभ्यास शिकण्यासाठी कॉम्प्युटर, नेटवर्क नाही, तर परीक्षेसाठी कुठून येणार. शिवाय हा महत्त्वाचा निर्णय अकॅडमिक काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या बैठकीत व्हायला हवा.' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षांसाठी हाती उत्तरपत्रिका, ऑडिओ नोटद्वारे उत्तरे, झूम, स्काइप, व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षेपासून ओपन बुक टेस्टपर्यंत अनेक पर्याय सुचवण्यात आले आहेत. डीयू कॉम्प्युटर सेंटरचे सहसंचालक डॉ. संजीव सिंह म्हणतात, 'ऑनलाइन परीक्षा ही कसोटी आहे. डीयू प्रशासनाच्या यासंदर्भात सातत्याने बैठका होत आहेत. पण अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थी सहजरित्या परीक्षा देऊ शकतील याची जोपर्यंत खातरजमा होत नाही, तोपर्यंत हा निर्णय घेणे अवघड आहे. एक टक्कादेखील विद्यार्थ्यांना आम्ही अपवाद करू शकत नाही. म्हणूनच तर प्रत्येक बारीकसारीक मुद्द्यावर चर्चा होत आहे.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eFQT3a
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments