शिक्षण विभागातील भरती थांबवली; ६८ हजारांहून अधिक टीईटीधारक नाराज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने शालेय शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्रातील पदभरती बंद घातली आहे. यामुळे राज्यातील सुमारे ६८ हजारांहून अधिक टीईटीधारक व शिक्षक भरतीस पात्र उमेदवारांची घोर निराशा झाली आहे. या संदर्भातील आदेश शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी काढले आहेत. कोविड-१९ मुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. वित्तीय उपाययोजना म्हणून पदभरतीस बंदी घातली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या खासगी, अल्पसंख्याक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील सर्व पदांना हा नियम लागू राहणार आहे. दरम्यान, राज्यातील 'पवित्र' या पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षकांची भरती प्रक्रिया अर्धवट अवस्थेत आहे. वित्त विभागाने १६ हजार १२४ शिक्षकांच्या भरतीला परवानगी दिली होती. त्यापैकी १२ हजार नव्या शिक्षकांची भरती झालेली आहे. काही कारणामुळे काही पदांच्या भरती अर्धवट अवस्थेत आहेत. या भरतीचे काय होणार असाही संभ्रम आता टीईटी व सीईटी उत्तीर्णधारकांपुढे आहे. 'काही विषयांना वगळा' या निर्णयामुळे जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित छोट्या शाळांना पदभरती बंदीचा मोठा फटका बसेल. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक हे विषयनिहाय अध्यापन करतात. त्यातच विज्ञान-गणित शिकविणारा एकच शिक्षक जूनमध्ये निवृत्त झाला तर त्याविषयाचे अध्यापन कुणी करावे? असा प्रश्न निर्णाण झाला आहे. त्यामुळे सरसकट पदभरती बंदी न करता इंग्रजी, विज्ञान व गणित विषयांना भरती बंदीतून वगळण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fnnFq0
via IFTTT

Post a Comment

0 Comments