Also visit www.atgnews.com
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; रद्द केल्या सर्व परीक्षा
दिल्ली सरकारने परीक्षांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण घोषणा आज शनिवारी ११ जुलै रोजी केली. सध्याच्या कोविड महारामीच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांसाठी अन्याय्य होईल असे सांगत दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. एकाही विद्यापीठात कोणतीही अंतरिम किंवा अंतिम परीक्षा होणार नाही. सिसोदिया म्हणाले, 'या सत्रासाठी कोणताही अभ्यास न झाल्याने कुठलीच परीक्षा होणार नाही. अशा अपवादात्मक उद्भवलेल्या परिस्थितीत अपवादात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर आम्ही विश्वास ठेवतो.' राज्यातील विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या मागील परीक्षा किंवा मागील सत्रातील कामगिरीच्या आधारे किंवा अन्य जी पद्धती त्यांना योग्य वाटेल त्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करावे, असे शासनाने विद्यापीठांना सांगितले आहे. 'अंतरिम सत्राच्या विद्यार्थ्यांना मूल्यांकन करून पुढील सत्रात प्रमोट करा आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मूल्यांकन करून डिग्री प्रदान करा. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी देणे गरजेचे आहे कारण त्यांनी इतकी वर्षे मेहनत केली आहे आणि आता त्यांना नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. काहींनी तर आधीच नोकरी सुरू करून कुटुंबाला आधार देण्यास सुरुवातही केली आहे,' असे सिसोदियांनी विद्यापीठांना सांगितले. महामारी काळामुळे शिकू न शकलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आप सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे, असेही सिसोदिया म्हणाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निर्णयाबाबत कळवले आहे. शिवाय जो निर्णय दिल्ली सरकारने घेतला तोच केंद्र सरकारने घ्यावा अशी विनंतीही केली आहे. पंतप्रधान नोदी आमच्या विनंतीला प्रतिसाद देतील अशी आम्हाला आशा आहे, असे सिसोदिया म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38KKMbf
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments