सीबीएसई फेरपरीक्षा रद्द करा; AISA ची मागणी

2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ () च्या कंपार्टमेंट परीक्षा रद्द करा अशी मागणी करणारे पत्र ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने (AISA) केली आहे. असोसिएशनने ही मागणी करणारे पत्र केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल आणि सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांना लिहिले आहे. पत्रात लिहिले आहे की, 'मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच गुण मिळाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही ग्रेस मार्क देण्यात यावेत किंवा प्रमोट करण्यात यावे.' या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून त्यांना परीक्षा द्यायला लावू नये. या विद्यार्थ्यांनी कॉलेजे प्रवेश घेतले आहेत. पहिल्या वर्षीची फी भरली आहे. या सर्वांचा विचार व्हावा. बिहार, मुंबई, आसाममधल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुराचा सामना केला आहे. करोनाचं संकट आणि पुराचं आस्मानी संकट झेललं आहे. अनेकांचे सामानसुमानही पुराच्या तडाख्यात वाहून गेलं आहे. या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासही झाला आहे. या सर्वाचा विचार व्हावा, अशी मागणी पत्रात केली आहे. दरम्यान, सीबीएसईने यापूर्वी म्हटलं आहे की कंपार्टमेंट परीक्षा घेतल्या नाहीत तर या मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होईल. बोर्डाकडेदेखील या परीक्षा रद्द करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण बोर्ड परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि जे विद्यार्थी एक किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही फेरपरीक्षा घेऊन त्यांना वर्ष वाचवण्याची संधी दिली जाईल, असे सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kZyl0X
via IFTTT

Post a Comment

0 Comments