पदवी परीक्षा: युवा सेनेने सुप्रीम कोर्टात लढवली खिंड

Final year exams 2020: पदवी परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घ्याव्यात या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांविरोधातील याचिकांवर शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. कोविड-१९ संक्रमण काळात परीक्षा घेण्यात कोणकोणत्या अडचणी आहेत, हे युवा सेनेचे वकील श्याम दिवाण आणि दिल्ली सरकारतर्फे युक्तीवाद करणारे अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी आता १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. युवा सेनेने लढवली खिंड युवा सेनेतर्फे वकील श्याम दिवाण यांनी शुक्रवारी युक्तिवाद केला. विद्यार्थ्यांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा येत आहे, असे ते म्हणाले. राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना आपत्तालिन व्यवस्थापन कायद्यातील तरतूदी कठोरपणे राबवण्याचे अधिकार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश आहेत, असे दिवाण यांनी न्यायालायाच्या निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून परीक्षांसंदर्भातील मुद्दे दिवाण यांनी मांडले. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ते निर्देश असल्याचं नमूद केलेलं आहे, असंही ते म्हणाले. परीक्षा आयोजित केल्यास कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात ते दिवाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणू दिले. अनेक वसतिगृहे, शिक्षण संस्थांच्या इमारतींचे रुपांतर क्वारंटाइन सेंटरमध्ये केले असल्याचे त्यांनी सांगितले. अभिषेक मनु सिंघवी यांनीही 'जगण्याचा अधिकार' या मुद्द्यावर युक्तिवाद केला. घटनेचे कलम २१ प्रत्येक नागरिकाला सर्व अधिकार देते तर या 'राइट टू लाइफ' वर गदा का आणली जात आहे, असे त्यांनी विचारले. गेले पाच महिने महाविद्यालये बंद आहेत. शिकवल्याशिवाय परीक्षा कशा काय घेतल्या जाऊ शकतात?, असा सवाल सिंघवी यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रत्येक राज्याला लागू आहे, असे ते म्हणाले; तेव्हा कोर्टाने विचारले की आपत्ती व्यवस्थापन कायदा चा परीक्षा घेण्याच्या अधिकारावर गदा आणू शकतो का? सिंघवी यांनी एप्रिलमधील यूजीसीची मार्गदर्शक तत्वे अधिक लवचिक होती, असेही सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2PPeDq7
via IFTTT

Post a Comment

0 Comments