Also visit www.atgnews.com
पदव्युत्तर मेडिकल परीक्षांना स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाल सुनावणी झाली. १७ ऑगस्टपासून आणि २५ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या पदव्युत्तर मेडिकलच्या परीक्षांना स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. तुम्ही करोनाच्या भीतीमुळे परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देण्यासाठीच घाबरत असाल तर मग रुग्णालयात रुग्णांवर उपचार तरी कसे करणार, असा खरमरीत प्रश्न न्यायालयाने परीक्षा देण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारला. करोनाच्या भीतीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची नसेल त्यांनी भविष्यात सुयोग्य कारण दाखवले तर न्यायालय त्यांच्याकरिता स्वतंत्र परीक्षा देण्याविषयी आदेश देऊ शकते. मात्र आता या टप्प्यावर परीक्षा घेण्यास स्थगिती देऊ शकत नाही. कारण अनेक विद्यार्थी असे असतील ज्यांना परीक्षा द्यायची असेल, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने याचिकादारांची विनंती फेटाळली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याशिवाय गत्यंतर नाही. आकाश उदयसिंग राजपूत आणि अन्य विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांचे वकील कुलदीप निकम यांनी कोर्टाला सांगितले की विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेसाठी तयार आहेत, मात्र ऑफलाइन परीक्षेमुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे. निकम यांनी ट्वीटरवरून घेतलेल्या माहितीच्या आधारे दोन पीजी मेडिकल विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली असल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे अॅड. राजशेखर गोविलकर यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की परीक्षांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे; त्यामुळे कोर्टाने तूर्त कोणताही आदेश देऊ नये. मात्र राज्यातील पीजी मेडिकल परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते हे त्यांनी न्यायालयाला सांगितले. ते म्हणाले, देशभरात पीजी मेडिकलच्या परीक्षा यापूर्वीच झाल्या आहेत. महाराष्ट्रात त्या न झाल्यास येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. करोनाला घाबरलात तर रुग्णांवर उपचार कसे करणार? तुम्ही करोनाच्या भीतीमुळे परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देण्यासाठीच घाबरत असाल तर मग रुग्णालयात रुग्णांवर उपचार तरी कसे करणार?, असा खडा सवाल मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देण्यास इच्छुक नसलेल्या पदव्युत्तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना केला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31Pqmux
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments