Also visit www.atgnews.com
JEE Main: विद्यार्थ्यांना भरावा लागेल डिक्लेरेशन फॉर्म; कशी होणार परीक्षा जाणून घ्या
How will be conducted amid corona virus pandemic: करोना विषाणू महामारीच्या काळातच काही दिवसांनी देशातली यंदाची पहिली राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा होणार आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे १ सप्टेंबर पासून जेईई मेन परीक्षेचे आयोजन होणार आहे. देशभरात विविध शहरांमधील विविध केंद्रांवर ही परीक्षा ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. देशविदेशातील लाखो उमेदवार या परीक्षेत सहभागी होतील. आता प्रश्न हा आहे की करोना संसर्ग काळात ही परीक्षा नेमकी कशी घेतली जाणार? जर कोणी विद्यार्थी करोना संक्रमित असेल तर तो परीक्षा देऊ शकणार का? एनटीएने विद्यार्थी-पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत... किती केंद्र? एनटीए द्वारे JEE Main 2020 चे आयोजन संगणक आधारित पद्धतीने होईल. बीटेक / बीई आणि बीआर्क साधी दोन वेगवेगळ्या परीक्षा होतील. बीटेक / बीई साठी देशभरात ६०५ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. बीआर्कसाठी देशातील विविध शहरांमध्ये ४८९ परीक्षा केंद्रं आहेत. भारतात एकूण २२४ शहरांमध्ये आणि परदेशातील आठ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. कशी घेतली जाणार परीक्षा? एनटीएमधील जेईई मेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सर्व परीक्षा केंद्रांच्या गेटवर प्रत्येक विद्यार्थ्याला एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरावा लागेल. यात आरोग्य सेतु अॅपमध्ये त्यांनी जी माहिती भरली असेल, ती भरायची आहे.' 'विद्यार्थ्यांना विचारले जाईल की त्यांना ताप, कोरडा खोकल्यासारखी कोणती लक्षणे आहेत वा नाही? गेल्या काही दिवसात ते कुठल्या करोनासंक्रमित रुग्णाच्या संपर्कात आले आहेत का? जर कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरातून तो विद्यार्थी संक्रमित असण्याची शक्यता असेल तरी त्याला परीक्षा देण्यापासून रोखण्यात येणार नाही,' असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांवर आयसोलेशन रुम बनवण्यात आले आहेत. करोना संक्रमित किंवा असिम्टमॅटिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवरील आयसोलेशन रुममध्ये बसून परीक्षा द्यावी लागेल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणखी काय उपाययोजना? एनटीए अधिकाऱ्याने सांगितले की 'जेईई मेन परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना थ्री-प्लाय मास्क दिले जातील, जे त्यांनी परीक्षा केंद्रात पोहोचल्यापासून बाहेल जाईपर्यंत घालणे अनिवार्य असेल. सर्व परीक्षा केंद्रे, संगणक, टेबल-खुर्च्या सॅनिटाइज केल्या जातील. परीक्षेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन केले जाईल.' परीक्षा सुरू होण्याआधी ही सर्व व्यवस्था करावयाची असल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रिपोर्टिंग वेळा देण्यात येणार आहेत, जेणेकरून एकावेळी एका ठिकाणी गर्दी होणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l4nxhQ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments