Also visit www.atgnews.com
'एनटीए' कडून 'नीट'ची तयारी; १५ लाखांवर विद्यार्थी देणार परीक्षा
NEET 2020: जेईई मेन परीक्षेनंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आता वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया असलेल्या नीट ची तयारी सुरू केली आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार असून त्यासाठी सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेली जेईई मेन परीक्षा रविवारी ६ सप्टेंबर रोजी संपली. कोविड-१९ महामारीमुळे या परीक्षा यापूर्वी दोन वेळा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. अखेर त्या सप्टेंबरमध्ये पार पडत आहेत. एनटीएमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील नीट परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सुरक्षित वावर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या २,५४६ वरून ३,८४३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय एका वर्गातील उमेदवारांची संख्या २४ वरून १२ पर्यंत कमी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राबाहेरील सुरक्षित वावर राखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे मार्ग वेगवेगळे ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्राबाहेर उमेदवारांना पुरेसे अंतर राखून उभे राहता यावे यासाठीही व्यवस्था केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे, यासाठी स्थानिक प्राधिकरणांनी देखील सहाय्य करावे अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर आणि परीक्षा हॉलमध्ये पूर्णवेळ हँड सॅनिटायझर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र देखील बारकोड रिडरच्या सहाय्याने स्पर्शविरहित पद्धतीने तपासले जातील. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाताना त्यांचे मास्क आणि सॅनिटायझर वापरायचे आहेत. मात्र परीक्षा केंद्रात शिरताना त्यांना स्वतंत्र मास्क देण्यात येतील. हे थ्री-प्लाय मास्क विद्यार्थ्यांनी संपूर्ण परीक्षा कालावधीत लावायचे आहेत. ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांनी विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था पुरवण्याचे आवाह केले आहे. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना लोकल सेवेचा लाभ घेण्याची मुभा आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकलही सोडण्यात येणार आहेत. कोलकात्यातही मेट्रो रेल्वे विशेष मेट्रो सेवा देणार आहे. दरम्यान, कोविड-१९ काळात या परीक्षा घेऊ नयेत, म्हणून विद्यार्थी-पालकांकडून मागणी होत होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती धुडकावून लावली. देशातील सहा बिगर भाजप राज्यांनी केलेली फेरविचार याचिकाही न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे नीट परीक्षा नियोजित वेळेत १३ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2DB7w2h
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments