Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठ 'आयडॉल' पदवी परीक्षांचे तीनतेरा; आजच्या परीक्षाही लांबणीवर
IDOL Exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दूर आणि मुक्त अध्ययन संस्था अर्थात आयडॉल (IDOL) च्या ऑनलाइन पदवी परीक्षा प्रक्रियेत सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा बीए आणि बीकॉमच्या अंतिम सत्राच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली. यापूर्वी शनिवार, ३ ऑक्टोबरच्या परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. दूर आणि मुक्त अध्ययन संस्था अर्थात आयडॉलमार्फत घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षांना सातत्याने तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना या सर्व प्रकारामुळे नाहक मनस्ताप होत आहे. परीक्षा ऑनलाइन असली तरी अनेक विद्यार्थी परीक्षा देता न आल्याने विद्यापीठाच्या सांताक्रूझ, विद्यानगरी येथील आयडॉलच्या विभागापर्यंत खेटे घालत आहेत. यात त्यांचा वेळ तर वाया जातोच आहे, शिवाय ज्या कारणासाठी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत, त्या आरोग्याच्या खबरदारीच्या उद्देशालाही हरताळ फासला जात आहे. मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी टीवायबीए आणि टीवाय बीकॉम्.ची दुपारी १ ते २ या वेळेत असलेली परीक्षा तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. दुसरीकडे, संलग्न महाविद्यालयांमार्फत होत असलेल्या ऑनलाइन पदवी परीक्षा मात्र बऱ्यापैकी सुरळीत होत आहेत. हेही वाचा: विद्यार्थी संघटना आक्रमक विद्यापीठाच्या या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थी तसेच शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुक्ता शिक्षक संघटनेचे महासचिव सुभाष आठवले म्हणाले, 'नेहमी तांत्रिक कारणे देऊन विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या IDOL मध्ये कोणतं सॉफ्टवेअर आहे याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. आणि जर IDOL मध्ये परीक्षा घेता येत नसतील तर संलग्न कॉलेजांमध्ये विद्यापीठाने काय केले दिवे लावले असते याची कल्पना न केलेली बरी. तिथे तर अधिष्ठाते अमुक तमुक सॉफ्टवेअर घ्या असा तगादा कॉलेजानां लावत आहेत. या सगळ्यांची उच्च स्तरीय समिती नेमून राज्यपालांनी / शासनाने सखोल चौकशी करावी.' अंतिम सत्राच्या परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे , अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देताना लॉगिन होत नाही तर अनेकांना मेल येत नाहीत. युनिव्हर्सिटीच्या संकेस्थळावर सर्व्हर डाउन असते तर विद्यापीठाचे नंबर 'व्यस्त' येतात. समोर आवसून भेडसावणाऱ्या ह्या समस्यांना सामोरे जाताना विद्यार्थी मानसिक त्रासातून जातात. या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांची गळती होऊन विद्यार्थ्यांना खड्डयात टाकले जात आहे अशी प्रतिक्रीया विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी व्यक्त केली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36DGAL9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments