शाळा सुरू करण्याबाबत केंद्राच्या गाइडलाइन्स जारी

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. १५ ऑक्टोबरपासून देशातील शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक - ५ () अंतर्गत हिरवा कंदिल दाखवला आहे. डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी (DoSEL) या विभागाशी सल्लामसलत करत ही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या गाईडलाइन्सनुसार, शाळा आणि कोचिंग क्लासेस योग्य त्या खबरदारीसह १५ ऑक्टोबरपासून उघडल्या जाऊ शकतील. अर्थात अंतिम निर्णय हा प्रत्येक राज्याने आणि केंद्रशासित प्रदेशाने तेथील परिस्थितीनुसार घ्यावयाचा आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक गरजांनुसार स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर राबवू शकतात. DoSEL नुसार, ज्या शाळा प्रत्यक्ष सुरू होणार आहेत, त्यांनी स्टॅँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे काटेकोर पालन करायचे आहे. या गाइडलाइन्स दोन भागात देण्यात आल्या आहेत. आरोग्य, हायजिन, सुरक्षितता आणि प्रत्यक्ष शिक्षण आणि सोशल डिस्टन्सिंग. आरोग्य, हायजिन आणि सुरक्षिततेसाठी जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सांगितले आहे, त्यानुसार, शाळा सुरू होण्याआधी सर्व शाळेची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करून घेणे आवश्यक आहे. हँड वॉश, डिसइन्फेक्शन, बैठक व्यवस्था, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, वेळापत्रक, एन्ट्री-एक्झिट पॉइंट्सची व्यवस्था आदी सर्व प्रकारची व्यवस्था काटेकोर पाळणे आवश्यक आहे. शाळा सुरू झाल्यानंतर, त्या सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळून उघडायच्या आहेत. दोन जणांमध्ये किमान ६ फुटांचं अंतर राखणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वर्गात, प्रयोगशाळेत, खेळाच्या मैदानावर संपूर्ण वेळ मास्क घालणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या लेखी परवानगीनंतरच शाळेत येऊ शकतील. विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीबाबत लवचिकता हवी. विद्यार्थी ऑफलाइन किंवा ऑनलाइन असा दोन्हीपैकी कोणताही पर्याय स्वीकारू शकतील. शाळेतील पोषण आहार बनवताना आणि वाटप करताना शाळांनी अत्यंत काटेकोरपणे आरोग्यविषयक खबरदारी घ्यायची आहे. शाळा सुरू झाल्या-झाल्या किमान २ ते ३ आठवडे कोणतीही परीक्षा शाळांनी घ्यायची नाही. जेव्हा परीक्षा घेतली जाईल, तेव्हा पेन-पेपरऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य द्यावे. शाळेच्या सुरक्षित पर्यावरणासाठी युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF) च्या गाइडलाइन्सची चेकलिस्टही पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात तूर्त तरी शाळा ऑनलाइनच महाराष्ट्रातली कोविड-१९ स्थिती पाहता राज्यातील शाळा सध्यातरी सुरू होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच घेण्यात येईल, असे सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cYzT7T
via IFTTT

Post a Comment

0 Comments