दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द व्हायला हव्यात: मनीष सिसोदिया

नव्या शिक्षण धोरणांतर्गत दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द व्हायला हव्यात अशी शिफारस दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे. सरकारने टप्प्याटप्प्याने मल्टी इयर वर्ग घेतले पाहिजेत आणि प्रत्येक टप्प्याच्या अखेरीस परीक्षा घ्यायला हवी. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची ५७ वी सर्वसाधारण परिषद गुरुवारी पार पडली. त्यात सिसोदिया बोलत होते. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या परिषदेचे अध्यक्ष होते. सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी यात सहभाग घेतला होता. जर ५+३+३+४ हे मॉडेल नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राबवायचे असेल तर वार्षिक श्रेणी पद्धती काढून टाकावी लागेल. म्हणजेच, सध्याच्या पद्धतीनुसार, एका वर्गातील सर्वच्या सर्व विद्यार्थी त्यांची आकलन क्षमता वेगवेगळी असूनही एका वेळी पुढील वर्गात जातात. बहुवार्षिक पद्धतीत विद्यार्थी त्याच्या अध्ययन क्षमतेनुसार, त्याच्या वेगाने प्रगती करेल, याकडे सिसोदिया यांनी लक्ष वेधलं. १०+२ या सध्याच्या मॉडेलमध्ये असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांना म्हणूनच ५+३+३+४ या मॉडेलमधून वगळावं लागेल. अन्यथा एका अखेरच्या टप्प्यात दोन बोर्ड परीक्षा ठेवल्या तर आधीच्या तीन टप्प्यांचं महत्त्व कमी होईल. शिवाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी उच्च शिक्षण प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा घेत असताना बारावी परीक्षांची आवश्यकताच नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'पुढील वर्षासाठी नीट, जेईई परीक्षांचा अभ्यासक्रम कमी करा' कोविड-१९ महामारी आणि त्यामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे अभ्यासावर परिणाम झाला आहे. परिणामी सर्व इयत्तांचा ५० टक्के अभ्यासक्रम कमी करायला हवा आमि पुढील वर्षी होणाऱ्या नीट, जेईई परीक्षांचा अभ्यासक्रमही कमी करायला हवा, असं सिसोदिया म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dRNv5c
via IFTTT

Post a Comment

0 Comments