करोनामुळे थांबले मुलींचे शिक्षण!

मुंबई, पुणे, नाशिक या शहरांतील पालक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शाळेत सहभागी होण्यासाठी कोणते उपकरण आणून द्यायचे याचा विचार करत असतानाच ग्रामीण भागातील पालक मात्र आपल्या पाल्यांना कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कोणत्या रोजगाराला पाठवू शकतो का, याचा विचार करत आहेत. परिणामी करोनामुळे ग्रामीण भागात विशेषत: मुलींचे शिक्षण थांबल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. करोनामुळे राज्यात ठाणे, पालघर, सोलापूर, बीड, पुणे या जिल्ह्यांतील वीटभट्टी, ऊसतोड कामगार, कुशल कामगार, नोकरदार मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झाला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाले आहे. राज्यात ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा विविध वास्तव समोर येऊ लागले. यातील बहुतांश सातवी ते आठवीतील विद्यार्थिनींना रोजगाराच्या कामाला पाठवल्याचे समोर आले आहे. तर, अनेक मुलींचे विवाहही जुळवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव शिक्षकांसमोर येत आहे. हातावर पोट असलेल्या आई, बाबाला पुन्हा एकदा मुलगी ओझे वाटू लागली आहे. यामुळे तिला कामाला लावून कुटुंबाचा चरितार्थ चालवावा किंवा तिचे लग्न लावावे, असे प्रकार ग्रामीण भागात घडत आहेत हे पाहून शिक्षकांमध्येही मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता जाणवू लागली आहे. या शाळाबाह्य विद्यार्थिनींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने वेळीच प्रयत्न करावेत, अशी भावना समाजातील सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. शहरातील विद्यार्थी गावाला मुंबई, ठाणे या शहरांत राहून रोजंदारी करणारा मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झाला. यामुळे मुंबईच्या ऑनलाइन शाळांतील बाकेही रिकामी होऊ लागली आहेत. दिवाळीपूर्वी असलेली उपस्थिती आता निम्म्यावर आल्याचे निरिक्षण शाळा नोंदवत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, पैसे नसल्याने ऑनलाइन वर्गात येणे शक्य नसल्याचे उत्तर शिक्षकांना मिळते. कमी होणाऱ्या पटसंख्येत विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असल्याचे निरीक्षण एका मुख्याध्यापकांनी नोंदविले आहे. मटा भूमिका काळातील स्थलांतराचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे. ऑनलाइन शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचत नाही हे सर्वज्ञात झाले आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षण असो किंवा ऑफलाइन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. याचा सरकारने गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा. यासाठी विद्यार्थ्यांना ते असलेल्या गावातील शाळेत प्रवेश देण्यापासून इतर अनेक पर्यायांचा सरकार विचार करू शकेल. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच सरकारने निर्णय घ्यावा आणि शिक्षणप्रवाहाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r77xyE
via IFTTT

Post a Comment

0 Comments