Also visit www.atgnews.com
सौमित्रच्या बुद्धिमत्तेचे 'रसायन' झळले
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई रसायनशास्त्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या '' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय याने बाजी मारत जगभरातील तब्बल १३२ चमूंना नमवले आहे. सलग ९६ तास चालणाऱ्या या स्पर्धेत सौमित्रचा एकट्याचा चमू होता. त्याने केलेल्या संशोधनाचा फायदा भविष्यात औषधनिर्माणशास्त्रात होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे. पुण्यातील 'आयसर' या संस्थेत पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सौमित्रने डेन्मार्क येथे आपले पीएचडी शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच संशोधनात करिअर करायचे ठरविल्यामुळे आयआयटीत मिळणारा प्रवेश नाकारून सौनमित्रने 'आयसर'मध्ये पदवी शिक्षण घेऊन संशोधनात करिअर करण्याचा निर्णय घेतला. येथे अभ्यास करत असताना, त्याला रसायनशास्त्रात गोडी निर्माण झाली. पुढे त्याने त्यातच करिअर करण्याचे ठरविले. पीएचडी शिक्षण घेत असताना, अनेक नामवंत शास्त्रज्ञांसोबत त्याने काम केले आणि अनेक प्रबंध प्रसिद्ध केले. या क्षेत्रात मानाची मानल्या जाणाऱ्या 'मर्क कम्पाउंड चॅलेंज' या स्पर्धेत त्याने सहभाग नोंदविला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना एक विशिष्ट प्रकरचा रसायनशास्त्राचे उदाहरण दिले जाते. यात दिलेल्या छोट्या रेणूला त्याचा प्रवास करण्यासाठी रसायनशास्त्राचा आधार घेत सर्वोत्तम असा मार्ग निर्माण करून द्यायचा असतो. यासाठी स्पर्धकांना ९६ तासांचा अवधी दिला जातो. यात वैयक्तिक किंवा दहा जणांच्या चमूसह सहभागी होता येते. सौमित्रने वैयक्तिक सहभाग घेतला होता. त्याने शोधलेला रासायनिक मार्ग हा सर्वोत्तम ठरला आणि १३२ टीम्समधून तो विजयी झाला. त्याच्यासोबत जर्मनीतील १० स्पर्धकांचा चमूही विजेता ठरला. या दोन्ही चमूंना दहा हजार युरोचे बक्षीस विभागून देण्यात आले. सौमित्र सध्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पोस्ट डॉक्टरल स्कॉलर आहे. या ९६ तासांत रसायनशास्त्राच्या सर्व कसोट्यांमधून जात रेणूसाठी हा मार्ग निश्चित केल्याचे सौमित्र सांगतो. ही स्पर्धा तुलनेत अवघड असते, यामुळे चमूत जेवढे जास्त सभासद असतील ते सर्व यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, मी एकट्यानेच हे केले, असे सौमित्र सांगतो. 'संशोधनाचा पाया उपयोगी ठरला' आयसर या संस्थेत रचला गेलेला माझा संशोधनाचा पाया यासाठी खूप उपयुक्त ठरल्याचेही तो सांगतो. या संशोधनाचा फायदा भविष्यात औषधनिर्माणशास्त्रापासून ते रसायनशास्त्रातील कोणत्याही प्रयोगासाठी होऊ शकतो, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. भविष्यात या क्षेत्रात जेवढे संशोधन करता येईल, तेवढे करण्याचा त्याचा मानस आहेच. याचबरोबर तरुण विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करावे. हे करत असताना त्यामध्ये झोकून देण्याची तयारी असावी. याचबरोबर परिस्थिती आणि व्यवहार्यता याचा विचार करूनही निर्णय घ्यावा, असा सल्लाही सौमित्रने दिला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3guVMNI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments