'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

Pariksha Pe Charcha 2021: यंदा पुन्हा एकदा '' 2021 कार्यक्रम आयोजित करणार आहेत. यामध्ये ते बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी परीक्षांचा ताण कमी करण्यासाठी टिप्स देणार आहेत. या कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत तब्बल आठ लाख साठ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर यावर्षी या कार्यक्रमात पालक आणि शिक्षकही सहभागी होतील. २.२५ लाख शिक्षक आणि ७८ हजार पालकांनी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी नोंदणी केली आहे. जर कुठल्या विद्यार्थ्याला या कार्यक्रमात सामील होण्याची इच्छा असेल तर अजूनही संधी गेलेली नाही. innovateindia.mygov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही लॉगइन करू शकता. नोंदणीची अंतिम मुदत १४ मार्च आहे. यानंतर कोणतीही नोंदणी स्वीकारली जाणार नाही. कार्यक्रमाच्या दरम्यान, नववी ते बारावीचे विद्यार्थी 'परीक्षा पे चर्चा' २०२१ स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही एका विषयावर अभिप्राय सादर करू शकतात. स्पर्धेतील विजेत्यांना थेट कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी असेल. विजेत्यांना प्रमाणपत्रे प्राप्त होतील. यावर्षी कोविड -१९ संक्रमणामुळे हा कार्यक्रम आभासी पद्धतीने होईल. एका अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, विजेत्यांमधील विद्यार्थ्यांच्या छोट्या गटाला पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. या विशेष विजेत्यांना पंतप्रधानांसमवेत त्यांचा एक स्वाक्षरी केलेला फोटोही मिळेल. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानाच्या संवादाचा कार्यक्रम पहिल्यांदा १५ फेब्रुवारी २०१८ रोजी तालकटोरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. यंदा चौथ्यांदा हा कार्यक्रम होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OIVdGo
via IFTTT

Post a Comment

0 Comments