Also visit www.atgnews.com
शाळाच सुरू नाहीत तर प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्यायच्या? मुख्याध्यापक पेचात
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले. मात्र स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्यास मान्यता देत नसल्याने, या परीक्षांचे नियोजन नेमके कसे करावे, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर आहे. यामुळे याबाबत मंडळाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन होणार, यावरून बराच खल सुरू आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. यातच मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र वर्षभर प्रयोगशाळेत पाय न ठेवलेल्या विद्यार्थ्यांची कशी घ्यावी, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. याचबरोबर या परीक्षांचे आयोजन करण्यासाठी स्थानिक प्रशासन परवानगी देणार आहेत का? यासाठी मंडळाकडून स्थानिक प्रशासनाशी काही पत्रव्यहवहार झाला आहे का, असा प्रश्न शिक्षक व मुख्याध्यापक विचारत आहेत. राज्य मंडळाने लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करण्याचे वेळापत्रक आखून दिले आहे. सद्यस्थितीमध्ये मुंबई, पुण्यात शाळा बंद आहेत. तसेच ग्रामीण भागात शाळा सुरू होत्या, तेथेही त्या बंद होऊ लागल्या आहेत. संपूर्ण शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. अशावेळी प्रात्यक्षिक परीक्षा नेमकी कशी घेणार, याबाबत मंडळाने अधिक स्पष्टता आणणे आवश्यक आहे, असे मत एका मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, मौखिक परीक्षा या ऑनलाइन होऊ शकत नाहीत. त्या ऑफलाइन घ्यायच्या असतील, तर त्याची दिशा मंडळाने जाहीर करावी, जेणेकरून तणावात असलेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना दिलासा मिळू शकेल, असे मत मुख्याध्यापक व्यक्त करत आहेत. श्रेणी परीक्षांना वालीच नाही कार्यानुभव, शारीरिक शिक्षण अशा विषयांच्या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार, याबाबतही अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना मंडळाकडून आलेल्या नाहीत. या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. क्रीडागुणांचे काय? यंदा क्रीडास्पर्धांचे आयोजन न झाल्याने विद्यार्थ्यांना क्रीडागुणांना मुकावे लागणार आहे. परिणामी, क्रीडा, स्काउट-गाइड, एनसीसी अशा विविध अभ्यासेतर उपक्रमांमधील विद्यार्थ्यांना गुणदान कसे करणार, याबाबतही सरकारने काहीच स्पष्टता आणलेली नाही. सध्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एप्रिल महिन्यात परिस्थिती सुरळीत असेल, असे म्हणात येणार नाही. यामुळे मंडळाने लेखी परीक्षांनंतर प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करण्याबाबत विचार करावा. तसेच याबाबत योग्य ते सविस्तर मार्गदर्शन जाहीर करावे. - जालिंदर सरोदे, कार्यवाह, शिक्षक भारती
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vbJyjR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments