Also visit www.atgnews.com
या राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी विनापरीक्षा पास
सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने बुधवारी शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी पहिली ते आठवी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना विनापरीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार आहे. COVID-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शाळा गेले संपूर्ण वर्ष बंद होत्या. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार ने विद्यार्थ्यांना योग्य स्तरावर आणण्यासाठी नव्या शैक्षणिक सत्रातील पहिल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये यासाठी विशेष वर्गांचे आयोजन करण्याचाही निर्णय घेतला आहे. हा निर्णय शालेय शिक्षण विभागांतर्गत सरकारी, सरकारी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांसाठी लागू होईल. ओडिशात दहावी आणि बारावीचे वर्ग ८ जानेवारी रोजी पुन्हा उघडले होते. मात्र कॉलेज आणि विद्यापीठे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ११ जानेवारीपासून पुन्हा सुरू झाली होती. अनेक राज्यांनी शाळा पुन्हा सुरू केल्या होत्या. पण आता करोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात तर ही संख्या वेगाने वाढत आहे. देशावर पुन्हा करोना संक्रमणाचं संकट नव्याने उभं राहिलं आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता ओडिशा सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे. पुद्दुचेरीतही निर्णय पुद्दुचेरी शालेय शिक्षण संचालनालयाने देखील इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत आणि १ एप्रिलपासून उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. परीक्षा होणार नसल्या तरी मार्चच्या अखेरच्या आठवड्यात एक एका दिवसाची ताण रहित चाचणी होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30UjM61
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments