Also visit www.atgnews.com
पीचडी पूर्ण न केलेल्या प्राध्यापकांना दणका
मुंबई : राज्यातील सरकारी आणि विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमध्ये न करता सहयोगी म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकांना दणका बसण्याची चिन्हे आहेत. अशा प्रकारे अध्यापनाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांवर उचित कार्यवाही करावी, अशी पत्र तंत्रशिक्षण सहसंचालक एस. एल. तडस यांनी दिली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजे आणि विद्यापीठांशी संलग्नित कॉलेजांमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी पीएचडी पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनेही तसेच आदेश काढले होते. मात्र, हे सर्व आदेश धाब्यावर बसवून अनेक कॉलेजांमध्ये पीएचडी नसलेल्या शिक्षकांना सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १८ फेब्रुवारी २००३नंतर तेव्हा पीएचडी न करता कायमस्वरूपी नियुक्त झालेल्या सहयोगी प्राध्यापकांना सात वर्षांत पीएचडीचे शिक्षण पूर्ण करण्याची मुभा दिली होती. या काळात पीएचडी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून सेवालाभ मिळतील असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले होते. मात्र या काळात नियुक्त असलेल्या अवघ्या २० टक्केच शिक्षकांनी पीएचडी पूर्ण केली. तरीही उर्वरित ८० टक्के प्राध्यापकांना कायमस्वरूपी सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती देण्यात आल्याचे शिक्षण कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी सांगितले. यासंदर्भात परिषदेनेही काही नियम जाहीर केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि परिषदेचे परिपत्रक या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत कॉलेजांमध्ये सर्रास पीएचडीधारक नसलेल्यांनाही सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. ही बाब गंभीर असल्याची तक्रार हरिदास यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे केली आहे. यानुसार सहसंचालकांनी पत्र काढून उचित कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विद्यापीठांना दिले आहेत. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६मधील तरतुदीनुसार विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सेवेच्या अटी व शर्ती इत्यादी आस्थापना विषयक बाबी विद्यापीठाच्या प्राधिकरणातील आहेत. यामुळे त्यांनी हरिदास यांच्या निवेदनानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे सहसंचालकांनी पत्रात स्पष्ट केले आहे. यामुळे आता अशाप्रकारे नियुक्त प्राध्यापकांवर कारवाई होण्याची शक्यता हरिदास यांनी व्यक्त केली आहे. तसेच अशा प्रकारच्या चुकीच्या नियुक्ती रद्द होऊन योग्य उमेदवारांना संधी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/312dwZN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments