Also visit www.atgnews.com
परीक्षेची तयारी करावी की नाही?
- सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील विद्यार्थ्यांना विशेषतः दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पुढे ढकललेल्या परीक्षा, वेळापत्रकात होणारे बदल, नक्की होणार की नाही? या सगळ्या अस्पष्टतेमुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्ये देखील अस्वस्थता, निराशा निर्माण झाली आहे. परीक्षेची तयारी करायची की नाही? परीक्षा कधी होणार? त्याचं स्वरूप काय असेल? समजा परीक्षा नाही झाल्या तर मग विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कसं करणार? त्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे? यासारखे अनेक प्रश्न घेऊन दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे पालक आमच्याकडे येतात. सध्या सगळ्यांनाच हे प्रश्न भेडसावत आहेत आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर सद्यस्थिती बघता या प्रश्नांची उत्तरं वेळेशिवाय कोणाकडेच नाहीत. वरकरणी बोलणं जरी सोपं वाटलं तरी प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ इत्यादींची उपलब्धता लक्षात घेता हा निर्णय घेणं फारच कठीण आहे. पालकांचा दृष्टिकोन लक्षात घेता त्यांच्यासाठी चिंतेची बाब म्हणजे भविष्यकालीन योजना कशा आखायच्या आणि आपल्या पाल्यास अभ्यास करण्यासाठी कसं आणि किती काळ प्रवृत्त करायचं याची माहिती नसणं. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, कोणत्याही वेळी अभ्यास करावा लागेल ही परिस्थिती नक्कीच स्वागतार्ह नाही. सद्य परिस्थितीमुळे किती काळ उजळणी करावी लागेल, परीक्षांचं स्वरूप कसं असेल, गुणांचं मूल्यांकन कसं केलं जाईल, पुढील परीक्षांसाठी नियोजन कसं करावं [विशेषतः ज्यांना प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत] इत्यादींची विद्यार्थ्यांना काहीच कल्पना नाही. अभ्यास चालू ठेवण्याचा दबाव जरी वाढत असला तरी कालांतरानं अभ्यास करण्याची प्रेरणा कमी होणं हे साहजिकच आहे. परीक्षांच्या अस्पष्टतेमुळे अभ्यास करायचा की नाही हे नक्कीच विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीही खूप तणावपूर्ण आहे. तणावातून मार्ग काढण्यासाठी अभ्यास आणि विश्रांतीची वेळ निश्चित केल्यास विद्यार्थ्यांना चांगली तयारी करण्यास नक्कीच मदत होईल. याचा आणखी एक फायदा म्हणजे अचानक परीक्षेची तारीख जाहीर झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर देखील होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफवांवर विश्वास ठेवणं किंवा सतत आपापसात चर्चा करण्यापेक्षा वरिष्ठ किंवा तज्ज्ञांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवणं नक्कीच हितकारक आहे. विषयाची संकल्पना समजून घेण्यापेक्षा केवळ जास्तीत जास्त गुण मिळवण्यावर भर असल्यामुळे परीक्षांच्या या अनिश्चिततेबद्दल तक्रारींचा सूर लावला जात आहे. लक्षात घ्या, ही एक जागतिक आपत्ती असून त्यावर तोडगा काढणं केवळ एका अधिकारी किंवा व्यक्तीच्या हाती आणि विशिष्ट ठिकाणापुरतं मर्यादित नाही. या अनिश्चिततेसह काही काळ सगळ्यांनाच जगायचं आहे, गरज भासल्यास काही काळ थोडं थांबावं देखील लागेल. अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी उत्तम दृष्टिकोन म्हणजे मानसिकरित्या सक्षम होण्याचा प्रयत्न करणं, आरोग्याची काळजी घेणं, व्यायाम करणं, विश्रांती घेणं आणि प्रत्येक दिवस जसा येईल तसं त्यास सामोरं जाणं. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, आज ते जे शिकत आहेत तेच पुढील अभ्यासक्रम आणि भविष्यकालीन करिअरचा पाया आहे. म्हणूनच त्यांनी संकल्पना समजून त्या बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. जेणेकरुन ते केवळ परीक्षेसाठीच तयार नाहीत तर आयुष्य आणि करिअरसाठी देखील तयार असतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dg6esx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments