Also visit www.atgnews.com
यंदा अकरावीचे प्रवेश कोणत्या गुणवत्तेवर?
म. टा. प्रतिनिधी, पुणे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याने, इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. पुण्यात सीबीएसई मंडळातून दहावी उत्तीर्ण होणारे काही विद्यार्थी राज्य मंडळाच्या ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोणत्या गुणवत्तेच्या निकषांवर प्रवेश मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेउन इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सीबीएसईतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या निकालाशी सहमत नसलेल्या विद्यार्थ्यांना करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षा देता येणार आहे. मात्र, या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी प्रमाणात राहणार आहे. त्यामुळे सीबीएसईच्या निकालाच्या नव्या फॉर्म्युल्याच्या आधारावर हे विद्यार्थी यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतील. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी नामांकित ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो, असे नेहमी तज्ज्ञांकडून सांगितले जाते. मात्र, यंदा सीबीएसईची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या मूल्यमापन पद्धतीद्वारे गुण देण्यात येईल, याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नाही. त्यातच यातून विद्यार्थ्यांना मिळणारे गुण वाढतील की कमी होतील, याबाबतही शंका आहे. राज्य मंडळदेखील इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पद्धतीने दोन्ही मंडळाचे गुण जाहीर झाल्यास, नामांकित महाविद्यालय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. सीबीएसईच्या निर्णयाप्रमाणे राज्य मंडळही दहावीच्या परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करू शकते. अकरावी प्रवेशासाठी दहावीचे गुण महत्त्वाचे असतात, आता गुणच नसतील तर प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ शकते. - वैशाली बाफना, शिक्षण सुधारणा मोहीम (सिस्कॉम)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dkBM0w
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments