Also visit www.atgnews.com
कसे राहील पुढचे शैक्षणिक वर्ष?
म.टा.प्रतिनिधी, नागपूर मागील पूर्ण वर्ष शैक्षणिक अस्थिरतेत गेल्यानंतर येणाऱ्या वर्षात शाळांची आणि शिक्षणाची स्थिती काय असेल, याबाबत शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण अद्यापही कायम आहे. पुन्हा एकदा ऑनलाइन शाळा घ्यावयाची झाल्यास उद्भवणाऱ्या प्रश्नांवर काय उपाय शोधावा, याच्या प्राथमिक चर्चांना शाळांमध्ये प्रारंभ झाला आहे. गतवर्षी करोनामुळे वर्गातील शिक्षण आणि परीक्षा या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या होत्या. आता, तिसऱ्या लाटेची आणि मुलांवरील परिणामांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे, पुढील शैक्षणिक सत्रातही ऑनलाइन शाळाच होतील, असे चित्र आहे. लहान वर्गांतील मुलांच्या प्रत्यक्ष शाळा होणारच नाहीत. मात्र, आठवी ते दहावी या वर्गांतील मुलांना तरी पालक शाळेत पाठवतील की नाही, याची शाश्वती नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यंदापासून नवे शैक्षणिक धोरण अंमलात येणार होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ते शक्य होईल का याची शाश्वती नाही. नव्या धोरणानुसार दहावीची शालांत परीक्षा रद्द झाल्यास त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालक तयार होणार नाहीत अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे. मागीलवर्षी अनेक शाळांनी ऑनलाइन शाळा घेण्याऐवजी व्हिडीओज पाठविणे, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अभ्यास घेणे असे पर्याय वापरले होते. मात्र, यंदाही प्रत्यक्ष शाळा होणार नसल्यास ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा विचार या शाळा करू लागल्या आहेत. यंदाही करोनामुळे ऑनलाइन शाळाच राहणार, अशी पक्की खूणगाठ बांधून शाळांनी तयारी सुरू केली आहे. गुणपत्रिकांचे करावयाचे काय? दहावी वगळता इतर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावयाची, असा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला होता. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावयाचे, याची जबाबदारी शाळांवर टाकण्यात आली होती. तसेच गुण न देता श्रेणी द्याव्या असेही सांगण्यात आले होते. अनेक शाळांनी असे मूल्यमापन केले आहे. मात्र, अद्यापपर्यंत कित्येक शाळांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिलेल्या नाहीत. शासनाने पुन्हा निकष बदलल्यास घोळ होऊ नये म्हणून अनेक शाळा ताक फुंकून पित असल्याचे दिसून येते आहे. दहावीचे वर्ग पडले मागे सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दलचा निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे, आता नववी उत्तीर्ण होऊन दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गांचाही खोळंबा झाला आहे. दरवर्षी, एप्रिलपासून दहावीच्या वर्गांना सुरुवात होत असे. यंदा बहुतांश शाळांमध्ये याबाबतच्या हालचालींना प्रारंभ झालेला नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SjmMIa
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments