Also visit www.atgnews.com
पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत संभ्रम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या रद्द करण्यात येत आहे. मात्र, राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे पालक, विद्यार्थी यांच्यात गोंधळाचे वातावरण आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे दर वर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा २३ मे रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता इयत्ता दहावीची परीक्षा राज्य शिक्षण मंडळाने; तसेच केंद्रीय शिक्षण मंडळाने रद्द केल्या आहेत. याचबरोबर जेईई, नीटच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सीए, सीएससारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत. याबाबत शिक्षक परिषदेने परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना पत्र लिहिले असता त्यांनी याबाबतचा निर्णय माझ्या अखत्यारित नसून राज्य सकारच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येईल. सद्यस्थितीत ही परीक्षा २३ मे रोजी होणार आहे, असे लेखी कळविल्याचे परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले. सध्या या परीक्षेचे ऑनलाइन वर्गही सुरू आहेत. यामुळे राज्य सरकारने तातडीने ही परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी दराडे यांनी केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eUKRg1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments