Also visit www.atgnews.com
वादळामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी
महाराष्ट्राला गेले दोन दिवस तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये पदवीच्या किंवा पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वादळामुळे परीक्षा देता आलेली नाही, त्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. इंटरनेट डिस्कनेक्टिव्हिटी, विजेअभावी ज्यांना परीक्षा देता आली नाही त्यांना त्या विषयाची पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी यासंदर्भातील माहिती देणारे ट्विट केले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चक्रीवादळामुळे हुकल्या आहेत, त्यांनी त्यांच्या विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन सामंत यांनी केले आहे. अनेक विद्यार्थी अशा भागांमध्ये राहणारे आहेत, जेथे प्रत्यक्ष वादळाचा तडाखा बसला. कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांना, सिंधुदुर्गापासून ते रायगड, मुंबई, ठाणे, पालघरपर्यंत अनेक भागांना वादळाचा तडाखा बसला. काही ठिकाणी वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम झाला. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वीज यंत्रणा संपूर्ण दिवस कोलमडलेली राहिली. परिणामी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. 'चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल,' असे ट्विट केंद्रीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bzmyDr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments