Also visit www.atgnews.com
QS World University Rankings 2022:जेएनयूला टॉप हजारमध्ये स्थान, कुलगुरू म्हणतात...
QS World University Rankings:क्यूएस वर्ल्ड यूनिव्हर्सिटी रॅंकिंगमध्ये जगातील टॉप १ हजार संस्थांमध्ये जहरलाल नेहरु विद्यापीठ() ला स्थान मिळाले आहे. यावर जेएनयूचे एम.जगदीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संस्थेने आपल्या पाठ्यक्रम बळकट केल्याने हे यश मिळाले आहे. जागतिक क्रमवारीत ५५०-६०० च्या दरम्यान क्रमांक मिळविणे हे पहिल्यांदाच घडत असल्याचे ते म्हणाले. या यशाचे वाटेकरी असलेल्या सर्व विद्यार्थी, कर्मचारी, माजी विद्यार्थ्यांचे त्यांनी आभार मानले. विद्यापीठ शिक्षणामध्ये सुधार, नाविण्य आणि संशोधन योग्य दिशेने सुरुच राहील असे ते म्हणाले. 'गेल्या पाच वर्षांत विज्ञान आणि सामाजिक विज्ञान शास्त्रीय अभ्यासक्रम सुदृढ करुन आधुनिक सामजिक पध्दती आणि अनेक नवीन शैक्षणिक पाठ्यक्रमांची माहिती घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रम आणि अटल बिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंट अॅंड इंटरप्रायझर्सची स्थापनेमुळे हे यश मिळाल्याचे ते म्हणाले. भारतीय विद्यापीठांनी देशासमोर उत्पन्नाच्या मुद्दा सोडवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. टॉपमध्ये जागा मिळवणाऱ्या संस्थांमध्ये अधिक भारतीय संस्था आल्याने भारताला व्यापक लाभ झाल्याचे ते म्हणाले. आमच्या विद्यापीठांनी भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि जगाला जलवायू, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रांसंबंधी वेगवेगळ्या आव्हानं पार पाडण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे ते म्हणाले. जागतिक रँकिंगमध्ये भारताच्या तीन विद्यापीठांना २०० टॉप विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळाले आहे. क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी रॅकिंग्स २०२२ मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई सतत चौथ्या वर्षांत भारतातील टॉपची संस्था राहीली आहे. या रॅंकिंगच्या टॉप २०० संस्थामध्ये ३ भारतीय उच्च शिक्षण संस्था आहेत. आयआयटी मुंबई (१७७ वे स्थान), आयआटी दिल्ली (१८५ वे स्थान) आणि आयआयएससीं बंगळुरु (१८६ वे स्थान आणि जगातील टॉपची रिसर्च युनिव्हर्सिटी) यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. जगातील २०० शीर्ष संस्थांमध्ये इतर कोणत्याही भारतीय संस्थानी २०१७ पासून जागा बनवली नव्हती. जागतिक रँकिंगच्या टॉप १००० मध्ये भारतीय उच्च शिक्षण संस्थांच्या एकूण संख्येत यावर्षी देखील कोणता बदल झाला नाही. २०१८ च्या रॅंकिंगमध्ये एकूण २० भारतीय संस्था होत्या. २०१९ मध्ये २४, वर्ष २०२० मध्ये २३ आणि २०२१ या वर्षात २१ भारतीय संस्थांनी जागा बनवली. २०२२ साठी २२ भारतीय संस्थाना स्थान मिळाले आहे. भारतातील अधिकतर विद्यालय आणि संस्था जगात उत्कृष्टता आणि तरुणांमध्ये बौद्धिक कौशल्याचा प्रयत्न करत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. "आईएसएसबी बंगळुरु जगात पहिल्या स्थानावर आहे. क्यूस जागतिक विद्यापीठ रॅंकिंमध्ये १८ व्या स्थानी आहे. या महान कार्याबद्दल शुभेच्छा, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/358jwCk
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments