Mumbai University: मुंबई विद्यापीठाची विद्यार्थीसंख्या घटली

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या सर्व भागातील कॉलेजे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत शिक्षण देत असतात. करोनाकाळात, म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये मुंबईमध्ये तब्बल तीन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. ही संख्या २०२१-२२मध्ये सुमारे दोन लाख ६० हजारांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे मुंबई शहरात तब्बल १२.५ टक्के कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6w4nRz2
via IFTTT

Post a Comment

0 Comments