UPSC त अपयशी? तरी त्या गुणांवर मिळू शकेल नोकरी

मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत म्हणजेच परीक्षेत तुम्ही अयशस्वी ठरला असाल तरी नाउमेद होण्याचं कारण नाही. या अयशस्वी उमेदवारांसाठी गेल्या तीनेक वर्षांपासून एक पर्याय देण्यात आला आहे, तो म्हणजे त्यांचे गुण सार्वजनिक करण्याचा. त्या गुणांच्या आधारेसार्वजनिक तसेच खासगी कंपन्या त्यांना देतात. २०१७ मध्ये हा प्रयोग केला तेव्हा केवळ ८०० उमेदवारांनी हा पर्याय निवडला होता. आता हा आकडा तब्बल १५ हजारांवर गेला आहे. दरवर्षी साधारणपणे ११ लाख उमेदवार परीक्षांसाठी अर्ज करतात, त्यापैकी अर्धे तर पूर्व परीक्षेतच बाद होतात, यशस्वीपणे मुलाखतींचा टप्पा पार करत अखेरपर्यंत सुमारे ६०० उमेदवार यशस्वी होतात. मात्र जे अन्य हजारो उमेदवार या खडतर प्रक्रियेतून मुलाखतींच्या टप्प्यांपर्यंत पोहोचलेले असतात त्यांच्या नोकरीच्या आशा या पर्यायामुळे पल्लवीत राहतात. या गुणांवर आधी दोनवेळा दोनशे हून अधिक उमेदवारांना या प्रयोगातून नोकरी मिलाली. २०१८ मध्ये हा आकडा सहा हजारांवर पोहोचला आणि त्यापैकी सुमारे १ हजार उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलावले. सूत्रांच्या माहितीनुसार, नागरी सेवा परीक्षेव्यतिरिक्त इंजिनीअरींग किंवा फॉरेस्ट सेवा यात अॅड केली तर १४ हजार उमेदवारांनी हा गुण सार्वजनिक करण्याचा पर्याय निवडला आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग (डीओपीटी) ने २०१६ मध्ये ही व्यवस्था सुरू केली. डीओपीटीच्या मते, गुण सार्वजनिक करण्याने खासगी कंपन्यांना उमेदवार शोधण्यासाठी एक चांगला पर्याय मिळतो. या सिस्टिममध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योग्यता आणि परीक्षेतील गुण, त्यांचा संपर्क क्रमांक आदी सगळी माहिती एका ठिकाणी मिळते. यासाठी एनआयसीने विशेषत्वाने वेबसाइट बनवली आहे. कोणाचे गुण किंवा पदवी सार्वजनिक करण्यापूर्वी यूपीएससीकडून त्या उमेदवाराची संमती घेतली जाते. परीक्षेचा अर्ज भरतानाच याविषयी विचारले जाते. हीच पद्धत अधिकाधिक परीक्षांमध्ये लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2S0hEpN
via IFTTT

Post a Comment

0 Comments