करोना: शिक्षकांनाही करायचंय 'वर्क फ्रॉम होम'!

मुंबई: विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने तसेच अन्य कामकाजासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थिती लावावी लागत आहे. पण त्यानंतर पेपर तपासणीसाठी शिक्षकांनाही करू द्यावे अशी विनंती शिक्षकांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य परिषदेने यासंदर्भातले पत्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाला पाठवले आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ज्या शिक्षकांकडे आल्या आहेत, त्यांना घरूनच पेपर तपासणीचे काम करू द्यावे.यापूर्वीही असे काम शिक्षकांनी केल्याचा अनुभव आहे, असे या पत्रात म्हटले आहे. शाळा बंद असल्याने शाळेचे कार्यालय देखील बंद असणार आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करू नये. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी आवश्यक तेवढे दिवस आवश्यक तेवढे शिक्षक हे काम पार पाडतील. याशिवाय मुंबईतील काही शाळांनी इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षा ठेवून विद्यार्थी व शिक्षकांना वेठीस धरले आहे. शासन निर्णयाचे उघडपणे उल्लंघन होत असल्याने संबंधितांना आवश्यक व स्पष्ट सूचना आपल्या स्तरावरून निर्गमित करण्यात याव्यात, अशी विनंती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38OxcSp
via IFTTT

Post a Comment

0 Comments