Also visit www.atgnews.com
नागपूर विद्यापीठालाही करोनाचा फटका; परीक्षा पुन्हा लांबणीवर
म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून पुढील २१ दिवस घोषित केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा फटका आता विद्यापीठांच्या परीक्षांना बसणार आहे. तीन एप्रिलपासून सुरू होणारा परीक्षेचा तिसरा टप्पा देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठला लांबणीवर टाकावा लागणार आहे. अद्याप त्याची अधिकृत घोषणा झाली नसली तरीही सरकारच्या लेखी आदेशानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी मटाने संपर्क साधला असता ते म्हणाले, देश्व्यापी लॉकडाऊनमुळे आता ३ एप्रिलच्या परीक्षा देखील पुढे लांबणीवर टाकाव्या लागणा आहे. तिसऱ्या टप्यात सुमारे २५० हून अधिक परीक्षा आणि दोन लाख विद्यार्थी त्यात बसणार होते. पहिल्या टप्यातील ९० टक्के परीक्षा झाल्या होत्या. त्या टप्यात २० ते २५ हजार विद्यार्थीच होते. त्यातील दोन ते तीन पेपर्स अद्याप शिल्लक आहेत. परंतु, त्या केवळ पदविका व प्रमाणपत्र परीक्षा असल्याने त्याचा इतका परिणाम होणार नव्हता. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १९ मार्चपासून सुरू होणाऱ्या होत्या. परंतु, त्याआधीच ३१ मार्चपर्यंतचे लॉकडाऊन घोषित झाले. त्यामुळे १८८ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, त्या परीक्षांना ९० हजाराहून अधिक परीक्षार्थी होते. त्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू होते. तसेच तिसऱ्या टप्यातील २५० हून अधिक परीक्षांची तयारी जवळपास ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली होती. त्यात विद्यार्थ्यघ्ना हॉल तिकीट वगैरे देण्यात आली होती. परंतु, आता देशव्यापी लॉकडाऊन घोषित झाले असल्याने पुढील १४ एप्रिलपर्यंतच्या सगळ्या परीक्षा आता लांबणीवर टाकाव्या लागणार आहेत. त्यात बीए, बी.कॉम्, बीएससी, बी. ई, एमटेक व एमए यासारख्या प्रमुख व नियमित परीक्षांचा समावेश होता. सरकारने १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन मागे घेतले तरीही विद्यापीठांना नवीन वेळापत्रक व विद्यार्थ्यांना नव्याने हॉल तिकीट देण्यासाठी किमान ८ ते १० दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सगळ्या परीक्षा घेण्यासाठी २१ एप्रिलनंतरचाच कालावधी मिळार आहे, असे डॉ. साबळे म्हणाले. एक महिन्याचा बफर झोन नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा साधारणपणे २५ जुलैपर्यंत संपतात. परंतु, यंदा विद्यापीठाने २५ जूनपर्यंत सगळ्या ८९९ परीक्षा पूर्ण होतील, असे वेळापत्रक आखले होते. त्यामुळे करोनामुळे जरी एक महिन्या परीक्षा घेता आल्या नाहीत तरी विद्यापीठाला फार फटका बसणार नाही., असे डॉ. साबळे म्हणाल. निकाल वेळेतच येतील परीक्षा कधीही पुन्हा सुरू झाल्या तरीही लगेच उत्तरपत्रका तपासणीचे कामही सुरू करता येणार आहे. त्यमुळे निकाल जाहीर करण्यात फारसा विलंब होणार नाही. प्राध्यापकांकडून विद्यापीठाला आवश्यक असणारे सगळे सहकार्य मिळत आहे, असे डॉ. साबळे म्हणाले. तर केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा करोनामुळे जर १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन सारखी स्थिती कायम राहीली तर राज्य सरकारने एका विशेष परिस्थितीत तीन वर्षीय व चार वर्षीय अभ्यासक्रमातील केवळ अंतिम दोन सेमिस्टरच्याच परीक्षा घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना द्यावी. त्यामुळे तीन वर्षीय कोर्समधील एक ते चार सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना, तर चार वर्षीच्या कोर्समधील एक ते सहा सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना वरपास करण्याची मुभा द्यावी. ज्याप्रमाणे पहीली ते आठवीतील विद्यार्थ्यांना वरपास करण्यात आले, तसाच निर्णय घेण्याची विनंती सरकारला करावी लागणार आहे, असे डॉ. साबळे म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bulzBM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments