दहावीची भूगोलाची तर नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द

मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीची शिल्लक असलेली भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा होणार नसल्याचेही गायकवाड यांनी जाहीर केले. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन स्थितीत ३० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2wwxOPx
via IFTTT

Post a Comment

0 Comments