Also visit www.atgnews.com
परीक्षांसाठी शिक्षण विभागाचे तीन प्लान तयार!
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तीन वेळापत्रक तयार केले आहेत. ३१ मेपर्यंत कायम राहील, अशी शक्यता गृहित धरून तीन, १५ आणि ३१ मे नंतरचे वेळापत्रक तयार आहे, मात्र ही परीक्षा 'ऑनलाइन' नसेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. रखडलेल्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम वाढला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (२४ एप्रिल) राज्यातील कुलगुरूंची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रियेवर चर्चा झाली. या बैठकीचा आढावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी 'ऑनलाइन' पत्रकार परिषद घेऊन सांगितला. परीक्षेचे वेळापत्रक ठरवण्यासाठी राज्य शासनाने चार कुलगुरूंची समिती नेमली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाची समितीही परीक्षेबाबत सूचना करणार आहे. या सूचना प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाची समिती राज्यपालांकडे अहवाल सादर करणार आहे. राज्यपालांनी संमती दिल्यानंतर प्रत्येक घेणार आहे. सध्या तीन 'प्लॅन' तयार आहेत. तीन मे रोजी 'लॉकडाऊन' संपल्यास परीक्षेचे नियोजन, १५ मे आणि ३० मे रोजी 'लॉकडाऊन' संपल्यास वेगळे नियोजन केले आहे. 'लॉकडाऊन' किती काळ चालेल त्यावर परीक्षेचा निर्णय अवलंबून आहे, असे येवले यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमावलीवर परीक्षेचे नियोजन करणार आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या तासिका पूर्ण होऊ शकल्या नाही. त्यामुळे जेवढा अभ्यासक्रम झाला असेल त्यावर आधारितच परीक्षा व्हावी, असा मुद्दाही कुलगुरूंनी बैठकीत मांडला. प्रत्यक्षिक परीक्षा 'प्रोजेक्ट'वर विद्यार्थीहिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. सध्या परीक्षा निकाल आणि पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया याला प्राधान्य दिले आहे. त्यानंतर पेट, एम. फिल प्रवेश परीक्षा घेण्यात येतील, असे येवले यांनी सांगितले. दरम्यान, करोनाचा 'इफेक्ट' पुढील दोन वर्ष कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठांनी 'ऑनलाइन' अध्यापन पद्धती विकसित करावी, अशी सूचना शिक्षणमंत्र्यांनी केली. त्यानुसार विद्यापीठाने सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गरजू विद्यार्थ्यांना विद्यापीठाने जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले, विदेशी विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था केली, विद्यापीठ तीन हजार मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करणार आहे, अशी माहिती येवले यांनी दिली. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2S4ifpL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments