शाळांनी लॉकडाऊनमध्ये फी घेऊ नये: शिक्षणमंत्री

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात शाळांनी विद्यार्थी-पालकांकडून कोणत्याही प्रकारची फीची मागणी करू नये, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज केल्या आहेत. खरे तर याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने ३० मार्च रोजी काढले आहे. मात्र तरीही काही शाळा फीवसुलीसाठी पालकांच्या मागे तगादा लावत असल्याने आज शिक्षणमंत्र्यांना सोशल मीडियाच्या माध्यमाने शाळांना ही तंबी द्यावी लागलेली आहे. काय म्हणाल्या शिक्षणमंत्री? वर्षा गायकवाड म्हणाल्या, ' विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आहे हे आपण सगळेच जाणता. ही संचारबंदी ३ मेपर्यंत असणार आहे. मला सोशल मीडियाच्या आणि फोनच्या माध्यमातून काही पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की त्यांच्या शाळेकडून या लॉकडाऊनच्या काळातही फीची मागणी होत आहे. मी सांगू इच्छिते की आजची सामाजिक, आर्थिक परिस्थिती पाहता आणि पालकांची पैशांची उपलब्धता पाहता, माझे सर्व शाळा आणि संस्थांना आवाहन आहे की तुम्ही अशी फीची मागणी करू नये. परिपत्रकाच्या माध्यमातून तु्म्हाला सांगण्यात आलं आहे की लॉकडाऊनच्या काळात तुम्ही विद्यार्थी-पालकांकडून फीची कोणत्याही प्रकारची मागणी करू नये. माझं पालकांना आवाहन आहे की अशी मागणी होत असल्यास तुम्ही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2z3XwM9
via IFTTT

Post a Comment

0 Comments