मिझोरामच्या विद्यार्थ्यांची 'नो एक्झाम' मोहिम

देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन स्थिती आहे. सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन काळातच एका राज्याने बोर्डाची परीक्षा घेण्याची घोषणा केली. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले की, बारावीच्या उर्वरित विषयांची बोर्ड परीक्षा २२ एप्रिलपासून सुरू होईल. परंतु शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. हे राज्य मिझोरम आहे. २२ एप्रिलपासून बोर्ड परीक्षा सुरू करण्याच्या निषेधार्थ येथील विद्यार्थ्यांनी 'नो एक्झाम' ही मोहीम सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की ते आता परीक्षा देणार नाहीत. ते शिक्षणमंत्री लालचंदामा रालते यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत आहेत. खरं तर या विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की परिस्थिती सामान्य होईल तेव्हा परीक्षा घेण्यात यावी. यासाठी बरेच विद्यार्थी एमबीएसई, नो एक्झाम, नो रिस्क (#MBSE #NoExam #NoRisk) असे हॅशटॅग वापरून ही मोहिम चालवित आहेत. विद्यार्थी परीक्षेला विरोध करण्याची मागणी करणारे फलक दाखवत फोटोही शेअर करत आहेत. सोशल मीडिया मोहिमेद्वारे विद्यार्थी लॉकडाऊन दरम्यान परीक्षा घेण्याचा आपला निर्णय मागे घेण्यास राज्य सरकारवर दबाव आणत आहेत. इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्याने सांगितले की 'आमचं असं बिल्कुल म्हणणं नाही की आम्हाला परीक्षाच द्यायची नाही. आम्हाला एवढेच म्हणायचे आहे की अशा कठीण परिस्थितीत परीक्षा घेतली जाऊ नये. शिवाय त्या विद्यार्थ्यांचे काय, जे सध्या मिझोरममध्ये नाहीत? अनेक विद्यार्थी त्यांच्या गावी गेले आहेत. गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार सर्व संस्था ३ मेपर्यंत बंद राहतील आणि एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यातही ये-जा करता येणार नाही. त्यामुळे या परीक्षा घेऊ नयेत.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XKFU2u
via IFTTT

Post a Comment

0 Comments