विद्यापीठ, महाविद्यालयांच्या केवळ अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आज शुक्रवारी दुपारी १ वा. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी परीक्षेसंदर्भात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. १ ते ३१ जुलै दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती कायम राहिल्यास २० जूनच्या दरम्यान बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येक विद्यापीठ आपापले स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्य ज्या पदवीपूर्व वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करून नवीन वर्गात प्रवेश दिला जाईल. मात्र नापास झालेले विषय १२० दिवसांत परीक्षा घेऊन ते उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WfYeiF
via IFTTT

Post a Comment

0 Comments