विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! सिलॅबस कमी करण्याचा विचार

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार सुरू आहे. अभ्यासक्रम आणि शिकवण्याचे तास कमी करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या पर्यायावर केंद्रीय पातळीवर गांभीर्याने विचार सुरू आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे. पोखरियाल यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. याबाबत त्यांनी शिक्षकांची मतेही मागवली आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनीही ही मागणी केली होती. केवळ शालेय शिक्षणच नव्हे तर जेईई मेन, नीट यासारख्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमाबाबतही हा विचार केला जावा असी मागणी सिसोदिया यांनी केली होती. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे मुळातच विलंबाने सुरू होणार आहे. कोविड - १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीमुळे शाळा, महाविद्यालये सुरू होण्यास विलंब होणार आहे. जे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे, त्यातही अनेक अडथळे येत आहेत. यापुढेही या संपूर्ण वर्षावरच करोनाची छाया पसरलेली राहणार आहे. या अनुषंगाने हा विचार सुरू आहे. मात्र पुढील वर्षीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमातील कोणता भाग वगळायचा आणि कोणता भाग ठेवायचा यावर अद्याप कोणताही विचार झालेला नाही. याचसंदर्भात पोखरियाल यांनी शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि अन्य संबंधित घटकांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यांनी लिहिलंय, 'या प्रकरणी शिक्षकांची काय मते आहेत, शिक्षणतज्ज्ञांना काय वाटते ते त्यांनी लिहून #SyllabusForStudents2020 या हॅशटॅगसह MHRD च्या किंवा माझ्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर शेअर करावं. आम्ही निर्णय घेताना या सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करू.' दरम्यान, देशातील सर्वात मोठं शिक्षण मंडळ असणाऱ्या सीबीएसई बोर्डाने यापूर्वीच कमी करण्याचं सूतोवाच केलेलं आहे. पण अद्याप कोणती स्पष्ट घोषणा केलेली नाही. सिलॅबस प्रमाणित स्वरुपात (प्रपोर्शनेट) ठेवण्याबाबत बोर्डाचा विचार सुरू आहे. अभ्यासक्रम समिती यावर काम करत असल्याची माहिती बोर्डाने अधिकृतपणे निवेदनाद्वारे दिली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XMayYQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments