EPFO च्या उमेदवारांना निवड होऊनही नियुक्तीची प्रतीक्षाच

च्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या निकालानंतर जवळपास ७ महिने झाले तरी नियुक्ती मिळालेली नाही. सुमारे २४० उमेदवार बर्‍याच दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ईपीएफओने २० मे २०१९ रोजी सहाय्यक विभाग अधिकारी भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. या भरतीसाठी पूर्व परीक्षा ३० आणि ३१ मे २०१९ रोजी घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेचा निकाल १५ ऑक्टोबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आला. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागते. मुख्य परीक्षा ७ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात आली, त्यानंतर त्याचा निकाल २६ नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आला. कागदपत्र पडताळणी आणि निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी फेब्रुवारी २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्च २०२० च्या पहिल्या आठवड्यात झाली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता केवळ उमेदवारांची नेमणूक बाकी आहे. परीक्षा वेळेवर घेण्यात आली होती, म्हणूनच कागदपत्र पडताळणीनंतर आधीपासूनच जे उमेदवार नोकरी करत होते, त्यापैकी अनेक उमेदवारांनी ईपीएफओमध्ये जाण्यासाठी नोकरी सोडली. परंतु त्यांना ईपीएफओकडून आणि नियुक्तीसंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीबाबत फारच चिंता वाटत असून त्यांनी ट्विटरवरही आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. एका उमेदवाराने ट्विट केलंय, 'आम्हाला नियुक्ती न दिल्याने तुम्ही या महामारीपासून कसं वाचू शकाल? तेव्हा उगीच कारणं न देता आम्हाला नियुक्ती द्या.' एका उमेदवाराने महाराष्ट्रातले ESIC चे उदाहरण दिले. तेथे इतक्या मोठ्या स्तरावर कोविड- १९ संक्रमण असतानाही नियुक्त्या झाल्या तर आमची नेमणूक का करत नाही, असा सवाल या उमेदवाराने विचारले. असेच अन्य उमेदवारांनीही आपली नाराजी टि्वटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37UsDXW
via IFTTT

Post a Comment

0 Comments