Also visit www.atgnews.com
सीबीएसई परीक्षा: MHRD ची गृहमंत्रालयाशी सल्लामसलत
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय दहावी आणि बारावी च्या उर्वरित परीक्षांबाबत २५ जूनपर्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते. आणि मंत्रालयाद्वारे हा निर्णय घेतला जाणार आहे की बोर्डाच्या दोन्ही परीक्षा घ्यायच्या की रद्द करायच्या. सीबीएसईने मंगळवारी सांगितले की 'निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येईल.' सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि अनेक राज्य सरकार करत आहेत. करोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नाही, असे यांचे म्हणणे आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय या परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करत आहे. तूर्त नियोजित वेळापत्रकानुसार, या परीक्षा १ ते १५ जुलै या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या परीक्षा केवळ ईशान्य दिल्ली भागात तर बारावीच्या परीक्षा देशभरात आहेत. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही या परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्याकडे केली होती. दरम्यान, सीबीएसई बोर्ड गुरुवारी २५ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भातील माहिती देणार आहे. यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. करोना महामारीमुळे परिस्थिती आरोग्यदृष्ट्या परीक्षा देण्यास योग्य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. परिणामी सर्वोच्च न्यायलायाने बोर्डाला परीक्षांबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले होते. मंगळवारपर्यंत बोर्डाने आपला निर्णय सर्वोच्च न्यायालयाला कळवायचा होता. मात्र चर्चा अद्याप अंतिम निर्णयाप्रत यायची आहे. त्यामुळे आणखी एक दिवसाचा वेळ महाधिवक्ता तुषार मेहता यांनी कोर्टाकडे मागितला. त्यामुळे ही घोषणा आता २५ जूनवर गेली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31ciipa
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments