राज्यात पोलीस कॉन्स्टेबलच्या दहा हजार पदांवर भरती

Maharashtra For Constable post महाराष्ट्रात पोलीस विभागात हजोरा पदे भरली जाणार आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था भक्कम करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच ही माहिती दिली. या भरतीचा राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील पोलिसांना खूप फायदा होणार आहे. मंत्रालयात पवार यांच्या दालनात यासंदर्भात एक बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांसह विविध अधिकारी उपस्थित होते. त्यात गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस कॉन्स्टेबल पदे भरण्याचे निर्देश दिले. ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. राज्यात 10 हजार पोलीस शिपायांची भरतीसोबतच नागपुरातील काटोलमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियन स्थापन करण्यात आला. आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. हेही वाचा : राज्यात १० हजार पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसोबतच नागपुरातील काटोलमध्ये राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्यात आली आहे. या बटालियनसाठी १,३८४ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी आणि ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fhpfsW
via IFTTT

Post a Comment

0 Comments