मस्तच! दहावी, बारावीच्या टॉपर्सना शिक्षणमंत्र्यांकडून चक्क कार गिफ्ट

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत टॉपर्स कोण हे सांगण्याची परंपरा महाराष्ट्र राज्याने काही वर्षांपूर्वीच खंडित केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा नको या सकारात्मक विचाराने हा निर्णय झाला. मात्र देशात इतर अनेक राज्यात अजूनही टॉपर्सची नावे जाहीर केली जातात. झारखंडमधील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये अव्वल आलेल्या दोन विद्यार्थ्यांना झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांनी चक्क बक्षिस म्हणून दोन कोऱ्या करकरीत गाड्या दिल्या आहेत. बुधवारी या विद्यार्थ्यांचा झारखंडचे शिक्षणमंत्री जागरनाथ महतो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांना कार भेट देण्यात आली. दहावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा शिक्षणमंत्र्यांनी टॉपर्सना बक्षिस म्हणून कार देण्याची घोषणा केली होती. झारखंड अॅकेडमिक काउन्सिल (JAC) ने जुलै महिन्यात निकाल जाहीर केला. तेव्हा टॉपर्सची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. बुधवारी २३ सप्टेंबर रोजी झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक बिनोद बिहारी महतो यांच्या जयंतीनिमित्त या टॉपर्सना समारंभपूर्वक कारच्या चाव्या देण्यात आल्या. जागरनाथ महतो यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. अल्टो कार दहावीचा टॉपर मनीष कुमार कटियार आणि बारावीचा टॉपर अमीत कुमार यांना देण्यात आल्या, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, दहावी उत्तीर्ण असलेले शिक्षणमंत्री जागरनाथ महतो आपलं पुढील शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यासंदर्भातही त्यांनी अलीकडेच एक ट्विट केलं आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2G5TB5i
via IFTTT

Post a Comment

0 Comments