Also visit www.atgnews.com
हॉस्टेल सोडा; सरकारची नोटीस गरीब विद्यार्थ्यांच्या मुळावर
महामारीमुळे समाज कल्याण विभागाची हॉस्टेल व मेस बंद करण्यात आली आहेत, या हॉस्टेल मध्ये अनेक अनाथ विद्यार्थी राहतात या विदयार्थ्यांवर उपासमारी ची वेळ आली आहे, त्यात सामाजिक न्याय विभागाने आता हॉस्टेल सोडून जाण्यासाठी नोटीस पाठवायला सुरुवात केल्याने या विद्यार्थ्यांनी जायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनाथ विद्यार्थ्यांना हॉस्टेल मध्ये राहू द्यावे व त्यांच्यासाठी मेस सुरू करावी अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे यांनी केली आहे, अनाथ विद्यार्थी हे शिक्षणसाठी हॉस्टेल मधे राहतात व अजून कॉलेजेस सुरू झाले नाहीत, या विद्यार्थ्यांचे आई-वडील किंवा परिवार नाही त्यामुळे असा विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. असे विद्यार्थी सामाजिक संस्थांनी केलेल्या मदतीवर दिवस काढत आहेत. सरकारने त्यांची व्यवस्था करावी अन्यथा या विदयार्थ्यांना घेऊन मंत्री बंगल्यावर राहण्यास येऊ असा इशारा प्रहार प्रवक्ता अॅड. अजय तापकीर यांनी दिला आहे. प्रहार विद्यार्थी संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत - १) अनाथ विद्यार्थी, विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी. २) अनाथ विद्यार्थ्यांना जेवणाची सोय करण्यासाठी मेस सुरू करावी किंवा मासिक ५ हजार रुपये रोख रक्कम करून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करावी. मुंबई विद्यापीठात मुलभूत माहिती अधिकार अर्ज सुविधांचा अभाव ... माहिती अधिकार कायदा २००५ साली संमत झाला असून या कायद्याद्वारे प्रशासन पारदर्शक करण्याचा सरकारचा उद्देश १५० वर्षाचा इतिहास असलेल्या मुंबई विद्यापीठाचे प्रशासन अपयशी असून करोना सारख्या महामारीत मुंबई विद्यापीठात ऑनलाइन माहिती अधिकार अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप आज प्रहार विद्यार्थी संघटना अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी केला. अमरावती विद्यापीठ सोडले तर महाराष्ट्रात कोणत्याच विद्यापीठात ऑनलाइन माहिती अधिकार अर्ज दाखल करण्याची आणि माहिती मिळविण्याची सुविधा इतर कोणत्याच विद्यापीठात नसल्याने कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन व्यवस्था ढिसाळ असल्यानेच होत असल्याचा आरोपही मनोज टेकाडे यांनी केला. माहिती अधिकार कायद्यांतर्गत शासनाच्या आस्थापनांनी ऑनलाइन अर्ज सुविधा द्यावी असे शासन निर्णय आणि RTI कायद्यात असतांनाही ही अनास्था जणीवपूर्वकही करण्यात येत आहे .अर्जदाराला त्रास व्हावा हाच उद्देश्य विद्यापिठाचा आहे की काय असा सवालही उपस्थित होतो.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33RH5yi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments