नीट परीक्षेला ८५-९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

NEET 2020: नीट परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे रविवारी १३ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. जे विद्यार्थी नीट २०२० परीक्षेत उत्तीर्ण होऊन आवश्यक ते कट ऑफ गुण मिळवतील, त्यांना काउन्सेलिंगसाठी बोलावले जाईल आणि प्रवेश मिळेल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे नीट परीक्षेच्यचा उपस्थितीसंदर्भातील माहिती दिली. पोखरियाल यांनी ट्विट केले की,'एनटीएने मला सांगितले की नीट परीक्षेत सुमारे ८५ ते ९० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधांची व्यवस्था करणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांचे आणि एनटीएचे आभार मानतो. नीट परीक्षेसाठी यावर्षी परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली होती. नीटच्या आयोजनासाठी एनटीएला खूप तयारी करावी लागली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विविध राज्य सरकार आणि रेल्वेने मदत केली. नीटमधील सहभाग युवकांच्या आत्मनिर्भर भारताच्या प्रयत्नांचे आणि धैर्याचे द्योतक आहे.' ही परीक्षा आधी ३ मे रोजी होणार होती, कोविड १९ मुळे ती दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. २६ जुलै आणि १३ सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती, पण दोन्ही वेळ ती लांबणीवर पडली. मुंबईत केंद्रांचा गोंधळ मुंबईत या परीक्षेचे केंद्र ऐनवेळी बदलण्यात आले आणि त्याबाबत पालकांना व्यवस्थित माहिती न दिल्याने मोठा गोंधळ उडाला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) केलेल्या या चुकीबद्दल अनेक पालकांनी नाराजीलाा व्यक्त केली. जेईई मेनची उपस्थिती कमी जेईई मेन परीक्षेला ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ६ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजेच २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33wF6Q2
via IFTTT

Post a Comment

0 Comments