कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क? केंद्र सरकारच्या सूचना

Bag Policy 2020: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्कूल बॅग धोरणात ज्या शिफारसी केल्या आहेत, त्यापैकी एक आहे होमवर्कबद्दलची. इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठच देऊ नये अशी शिफारस केंद्र सरकारने या धोरणांतर्गत केली आहे. दप्तराचं वजन कमी करण्यासाठी सुचवलेल्या अनेक उपायांपैकी हा एक उपाय आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असायला नको, यावर या धोरणात भर देण्यात आला आहे. कोणत्या इयत्तेसाठी किती असावा होमवर्क? केवळ दुसरीपर्यंत गृहपाठ नसावी, एवढीच शिफारस केंद्र सरकारने केलेली नाही, तर अन्य इयत्तांसाठी देखील किती गृहपाठ असायला हवा हे सांगितले आहे. दप्तर कमी वजनाचं असावं यासाठी अभ्यासक्रमाचा बहुतांश भाग वर्गातच पूर्ण करण्यासंदर्भात आणि होमवर्क देण्यासंदर्भात अनेक महत्त्वू्र्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत. तिसरी ते पाचवी इयत्तेसाठी दर आठवड्याला जास्तीत जास्क २ तासांचा गृहपाठ असावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. माध्यमिक वर्गांना म्हणजेच सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कमाल एक तास म्हणजेच दर आठवड्याला ५ ते ६ तासांपेक्षा अधिक होमवर्क नसावा, अशी शिफारस आहे. उच्च माध्यमिक शिक्षणात किती हवा होमवर्क? स्कूल बॅग धोरणात उच्च माध्यमिक शिक्षणातही किती होमवर्क दिला जावा याबाबतच्या सूचना देण्यात आली आहे. या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना दर दिवशी दोन तासांहून अधिक होमवर्क दिला जाऊ नये. म्हणजेच दर आठवड्याला १० ते १२ तासांचाच होमवर्क असावा असं हे धोरण सांगते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39RINEA
via IFTTT

Post a Comment

0 Comments