प. बंगालनंतर आणखी एका राज्याने रद्द केल्या परीक्षा

करोनामुळे चालू शैक्षणिक वर्षात देशातील सर्व शाळांमध्ये अद्याप ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण सुरू आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर काही ठिकाणी नववी ते बारावीच्या शाळा उघडल्या आहेत. अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांनी संपूर्ण नव्या वर्षात घरी बसून इंटरनेटवर अभ्यास केला आहे. त्यामुळे प. बंगालने सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यामागोमाग मध्य प्रदेशनेही प. बंगालच्या पावलावर पाऊन ठेवून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली आहे. मध्य प्रदेशातील शाळांमधील विद्यार्थ्यांना क्लास प्रोजेक्टच्या आधारे प्रमोट केले जाणार आहे. या राज्यातील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ मार्च २०२१ पर्यंत बंदच राहणार आहेत. मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांनी शिक्षण संघटनांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी परीक्षेच्या पॅटर्नमधील बदलाबाबतही सांगितले. दहावी, बारावीच्या परीक्षा नेहमीप्रमाणे होणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शाळेत जाता येणार आहे. दरम्यान प. बंगाल राज्याने मोठी निर्णय घेतला आहे. प. बंगाल राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील इयत्ता सहावी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या यंदा परीक्षा न घेण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. सहावी ते नववीचे राज्य मंडळाच्या शाळांमधील सर्व विद्यार्थी परीक्षेशिवाय पुढील वर्गात जाणार आहेत. मात्र जेव्हा नियमित शाळा सुरू होतील, तेव्हा शिक्षकांनी पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी मागील वर्षाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करायची आहे. सोमवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला. शाळा माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VY8s6u
via IFTTT

Post a Comment

0 Comments