Also visit www.atgnews.com
सहावी ते नववीचे विद्यार्थी परीक्षेविना होणार पास; 'या' राज्याचा निर्णय
कोविड-१९ विषाणू महामारीचा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षावर खूप मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांनी या नवीन वर्षात अद्याप पर्यंत शाळेची पायरी चढलेली नाही. सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. काही शाळा आपापल्या पद्धतीने ऑनलाइनच परीक्षा घेत आहेत. अशातच प. बंगाल राज्याने मोठी निर्णय घेतला आहे. प. बंगाल राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील इयत्ता सहावी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या यंदा परीक्षा न घेण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. सहावी ते नववीचे राज्य मंडळाच्या शाळांमधील सर्व विद्यार्थी परीक्षेशिवाय पुढील वर्गात जाणार आहेत. मात्र जेव्हा नियमित शाळा सुरू होतील, तेव्हा शिक्षकांनी पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी मागील वर्षाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करायची आहे. सोमवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला. शाळा माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे. प. बंगाल शासकीय शिक्षक असोसिएशनचे महासचिव सौगता बासु म्हणाले की 'यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यांना आधीच्या वर्गात वगळलेले पाठ पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. मात्र नववीतून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना थोड्या अवधीत संपूर्ण नववीच्या अभ्यासक्रमाची उजळणी करावी लागेल. त्यांच्यावर नाहक ताण येणार आहे.' प्रमोट होऊन दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ तेच टॉपिक शिकवावेत ज्याचा संदर्भ त्यांच्या दहावीच्या अभ्यासाशी आहे, असा सल्ला काही शिक्षकांनी दिला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37ECYrm
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments