दहावी, बारावीच्या परीक्षा कधी? निकाल कधी? जाणून घ्या....

SSC : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत आणि बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. वाचाः करोनासाठी आवश्यक ती काळजी घेऊन या परीक्षांचे नियोजन केले जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. परीक्षा झाल्यानंतर बारावी परीक्षांचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्या तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. वाचाः निकाल कधी? दहावी, बारावी परीक्षेचे निकाल कधी जाहीर केले जातील याबाबतची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दहावीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. वाचाः गेले अनेक दिवस लाखो विद्यार्थी परीक्षांच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत होते. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा विलंबाने होत आहेत. वाचाः वाचाः


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39QqIF9
via IFTTT

Post a Comment

0 Comments