Also visit www.atgnews.com
दहावी, बारावीची श्रेणीसुधार परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नियमित व खासगी विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा २५ टक्के कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार होणार आहे. तर, पुनर्परीक्षार्थी; तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहेत. मात्र, राज्य मंडळाकडून या दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे; तसेच प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन कसे करण्यात येते, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केलेला आहे. त्यामुळे उर्वरित अभ्यासक्रमावर दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. मात्र, पुनर्परीक्षार्थी; तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यायची, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर उपस्थित झाला होता. त्यामुळे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकाद्वारे याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियमित, खासगी, तुरळक विषय घेऊन इयता दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा होतील. तर, पुनर्परीक्षार्थी; तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२० ची परीक्षा दिली आहे. त्यामुळे त्यांची यंदाची चालू शैक्षणिक वर्षासाठी होणारी परीक्षा संपूर्ण १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/371aCYL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments