Also visit www.atgnews.com
मुंबईत कॉलेज सुरु होण्याचा मुहूर्त लांबणीवर?
म. टा. विशेष प्रतिनिधी, करोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. त्यानंतर कॉलेजे सुरू करण्याचा निर्णयही राज्य सरकारने जाहीर केला असून १५ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार आहेत. मात्र मुंबईतील विद्यार्थ्यांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. २० फेब्रुवारीपर्यंत याबाबतचा निर्णय होणार नसल्याचे मुंबई महापालिकेच्या सूत्रांकडून समजते. यामुळे तूर्तास शहरातील कॉलेजे व शाळा बंदच राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने योग्य ती काळजी घेत कॉलेजे सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र राज्यातील करोनाची रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने कॉलेजे सुरू करण्याचा निर्णय घेतला नव्हता. परंतु आता राज्यातील शाळा टप्प्याटप्याने सुरू करण्यात येत असून, प्रथम नववी ते बारावीचे वर्ग व त्यानंतर चौथी ते आठवीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, राज्यातील कॉलेजे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने विचार सुरू केला होता. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून कॉलेजे सुरू करण्याचे निर्देश सरकारने राज्यातील सर्व विद्यापीठाना दिले होते. मात्र त्यासाठी स्थानिक प्रशासनांची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने तयारी सुरू केली असली, तरी मुंबई महापालिकेने कॉलेजे सुरू करण्यास विद्यापीठाला आणखी काही काळ प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. मुंबई विद्यापीठाने कॉलेजे सुरू करण्यासंदर्भात पालिकेकडे विचारणा केली असता, २० फेब्रुवारीपर्यंत कॉलेजे सुरू करता येणार नाहीत, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. आम्ही करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आढावा घेत आहोत, त्यानंतर पुढील निर्णय कळवण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी मुंबईतील कॉलेजे सुरू करता येणार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व कॉलेजे सुरू झाली, तरी मुंबईतील कॉलेजे बंद राहणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात मुंबई, ठाणे व नवी मुंबई महापालिकांकडेही विचारणा केली असून, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली. कॉलेजांची तयारी सुरू प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासाठी शहरातील काही कॉलेजांनी तयारी सुरू केली आहे. यामध्ये बहुतांश कॉलेजांनी पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्यांने वर्गात उपस्थित राहण्याबद्दल सूचना केली होती. याचबरोबर उर्वरित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचा विचार कॉलेजांनी केला आहे. मुंबईत शाळाही बंदच राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्या, तरी मुंबई, ठाणे परिसरात शाळा सुरू झालेल्या नाहीत. कॉलेज सुरू करण्याचे आदेश आल्यानंतर शहरातील शाळाही सुरू होऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता शाळा सुरू होणेही लांबणीवर पडेल, अशी शक्यता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pg2Kch
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments