मॅथ्स, फिजिक्स सक्तीबाबत अधिकार राज्यांना; AICTE ने झटकली जबाबदारी

update: इंजिनीअरिंग प्रवेशासाठी गणित आणि भौतिकशास्त्र विषयाची सक्ती करायची की नाही, याबाबतचा निर्णय संबंधित राज्य सरकार आणि विद्यापीठे किंवा शिक्षण मंडळांनी घ्यावा, असे सांगून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने आपली जबाबदारी झटकली आहे. यामुळे यातून नवे वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी बारावीत गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय अनिवार्य होते. २०२१-२२च्या हस्तपुस्तिकेत हे पात्रता निकष बदलण्यात आले आहेत. यानुसार विद्यार्थ्यांना या दोन विषयांऐवजी अन्य विषय घेऊन इंजिनीअरिंगला प्रवेश मिळवता येणार आहे. हस्तपुस्तिकेमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल विषय, अॅग्रिकल्चर, इंजिनीअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, आंत्रप्रुनरशीप यापैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणे आणि बारावीत या तीन विषयांमध्ये एकत्रित ४५ टक्के गुण (आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के) असणे आवश्यक आहे. हा निर्णय 'नवीन शिक्षण धोरण' डोळ्यासमारे ठेवून घेण्यात आला आहे. मात्र, यावरून टीका झाल्यानंतर ''ने हस्तपुस्तिका मागे घेतली होती. याबाबत सुधारित हस्तपुस्तिका प्रसिद्ध करून पात्रतेचा निर्णय राज्य सरकार आणि संबंधित विद्यापीठे घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याऐवजी आणखी गोंधळ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिक्षण सोडण्याची मुभा इंजिनीअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर अनेकदा काही विद्यार्थ्यांना ते शैक्षणिकदृष्ट्या जड जाते. यामुळे अनेकांना शिक्षण सोडावे लागते. मात्र आता शिक्षण घेतलेली वर्षे फुकट जाणार नाहीत. आता विविध टप्प्यांवर प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे. आता प्रत्येक वर्षी विद्यार्थी जेवढी कौशल्ये आत्मसात करेल, त्यानुसार त्यांना प्रमाणपत्र देता येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात याबाबत मांडलेल्या आराखड्याच्या अनुषंगाने एआयसीटीई त्यांच्या सुधारित नियमावलीत तरतूद केली आहे. विद्यार्थ्याने प्रत्येक स्तराच्या प्रमाणपत्रासाठी निश्चित केलेले श्रेयांक मिळावल्यास पदविका प्रमाणपत्र देता येणार आहे. त्या आधारे त्यांना रोजगारही मिळू शकणार आहे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. परिषदेने तंत्रशिक्षण कॉलेजांना कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार कॉलेजे व्यवसाय शिक्षण पदविका (डी.व्होक) आणि पदवी (बी.व्होक) हे अभ्यासक्रम सुरू करू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आणखी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Q4ZpRt
via IFTTT

Post a Comment

0 Comments