Also visit www.atgnews.com
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MCQ परीक्षा १० एप्रिलपासून
म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात १० एप्रिलपासून सुरू होणार आहेत. एमसीक्यू पद्धतीने परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देता येणार आहे. बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के सिलॅबस असेल. व्यावसायिक कोर्ससोबतच 'सीईटी'द्वारे उशिरा प्रवेश झालेल्या कोर्ससाठी (प्रथम सत्र) ७० टक्के अभ्यासक्रम असेल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळाकडून देण्यात आली आहे. या परीक्षांमध्ये एकूण ६० एमसीक्यू प्रश्न विचारण्यात येणार असून, त्यापैकी कोणतेही ५० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागणार आहेत. या प्रश्नांसाठी एक तासाचा अवधी देण्यात आला आहे. या परीक्षा केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थ्यांना मोबाइल, टॅब, लॅपटॉप, कम्प्युटर आदी कोणत्याही माध्यमाद्वारे ही परीक्षा देता येणार आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतर्गत आवश्यकतेनुसार महाविद्यालयस्तरावर प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक येत्या २५ मार्च रोजी विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव व्हावा, यासाठी सात एप्रिलपासून सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी परीक्षा समन्वय कक्ष महाविद्यालयांना स्थापन करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रथम व द्वितीय सत्रातील प्रॅक्टिकल, मौखिक परीक्षा, सेमिनार, मिनी प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आदींचे आयोजन संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा प्रथम सत्राचा शेवटचा पेपर झाल्यानंतर महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करावे, यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढले जाणार नाही, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले. परीक्षेबाबत प्रमुख माहिती - थोड्या प्रमाणात प्रॉक्टर्ड 'मेथड'चा वापर - परीक्षा ५० गुणांची असली, तरी अंतिम निकाल मान्य आराखड्यानुसार जाहीर होतील. - योग्य ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक द्या. - दिव्यांग विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा जास्त कालावधी असेल. - परीक्षा ऑनलाइन असल्याने छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची सुविधा नाही. - महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण १० एप्रिलपर्यंत विद्यापीठाला पाठवायचे असून, त्यांचाच निकाल जाहीर होईल. वेळ वाढवून देण्याची ग्वाही परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा अर्ध्यातच बंद पडल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी जेवढे प्रश्न सोडविले आहेत ते सिस्टीममधून सेव्ह झालेले असतील. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा मध्येच बंद पडल्यास कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vBBmts
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments